शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

स्मृती इराणींचा पराभव करण्यासाठी प्रियांका गांधींची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 8:05 AM

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या ...

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासाठी अमेठी आणि रायबरेली लोकसभा जागा या प्रतिष्ठेचा प्रश्न बनल्या आहेत. काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले असले तरी, अमेठी आणि रायबरेलीमध्ये प्रियांका स्वतः निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या भूमिकेत आहेत.प्रियांका सध्या दररोज अमेठी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भेटी देत आहेत या भागात वर्चस्व असलेल्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. तसेच, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची अमेठीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भूपेश बघेल यांची रायबरेलीचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.

नेमके काय करणार? हे दोन नेते कोणतीही निवडणूक सभा घेत नाहीत तर, पडद्याआडून निवडणुकीचे व्यवस्थापन बघत आहेत. किशोरीलाल शर्मा यांना उमेदवार बनवण्यामागे काँग्रेसची रणनीती अशी आहे की, स्मृती इराणींना पराभूत करून त्यांना संदेश द्यायचा आहे की, या निवडणुकीत एका छोट्या काँग्रेस कार्यकर्त्याने केंद्रीय मंत्र्याचा पराभव केला. त्यामुळे प्रियांका यांनी पुढील १३ दिवस तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप राहुल विरोधात खोटे बोलण्यात गुंतलेलीप्रियांका गांधी यांनी आरोप केला की, भाजपची संपूर्ण यंत्रणा राहुल गांधींविरोधात खोटे पसरवण्यात गुंतलेली आहे. भाजप धर्म, जात आणि मंदिर-मशिदींबद्दल बोलतो, पण लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर बोलत नाही. भाजपला राज्यघटना बदलायची आहे, पण निवडणुकीत याचा त्रास सहन करावा लागेल, हे लक्षात आल्यावर त्यांनी अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.

लोकांना वाटते की त्यांच्या समस्यांवर चर्चा व्हावी, त्यांना उपाय हवा आहे. सरकारने वाढलेली बेरोजगारी, महागाई दूर करण्यासाठी काय केले हे त्यांना जाणून घ्यायचे आहे. मी पंतप्रधानांना बेरोजगारीवर बोलण्याचे आव्हान देते. बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वाधिक आहे.- प्रियांका गांधी, काँग्रेस नेत्या

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीamethi-pcअमेठीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधी