शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Priyanka Gandhi : "भाजपाच्या राजवटीत 1 लाख शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; काँग्रेसचं सरकार आलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:13 IST

Priyanka Gandhi And BJP : प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी सांगितलं की, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले ना एमएसपी दिला गेला. काँग्रेसचे सरकार आल्यास केवळ एमएसपीची गॅरंटी देणार नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली जाईल असं आश्वासन प्रियंका यांनी दिलं आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, यावेळी प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं देत आहे. असंच आश्वासन काँग्रेसने दिलं आहे, ज्यात म्हटलं आहे की, ते शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर गॅरंटी देणार आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीही तीच मागणी आहे. 

प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर आरोप केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज देशात दररोज 30 शेतकरी आत्महत्या करत आहेत. भाजपाच्या राजवटीत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि उपकरणांवर जीएसटी वसूल केला जातो."

"10 वर्षांत ना शेतकऱ्यांना एमएसपी मिळाला ना त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा एक पैसाही माफ झाला नाही, तर काही उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ झाले. काँग्रेस सरकारमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. कृषी उपकरणे जीएसटीमुक्त असतील."

"एमएसपीची कायदेशीर गॅरंटी असेल. पिकांच्या नुकसानीबाबत 30 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. नवीन आयात-निर्यात धोरण केले जाईल. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे 72,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. काँग्रेस पुन्हा येईल. एमएसपी, कर्जमाफी आणि चांगल्या उत्पन्नाच्या गॅरंटीसह समृद्धी येईल" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाFarmerशेतकरीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४