शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

Priyanka Gandhi : "भाजपाच्या राजवटीत 1 लाख शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; काँग्रेसचं सरकार आलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:13 IST

Priyanka Gandhi And BJP : प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी सांगितलं की, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले ना एमएसपी दिला गेला. काँग्रेसचे सरकार आल्यास केवळ एमएसपीची गॅरंटी देणार नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली जाईल असं आश्वासन प्रियंका यांनी दिलं आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, यावेळी प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं देत आहे. असंच आश्वासन काँग्रेसने दिलं आहे, ज्यात म्हटलं आहे की, ते शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर गॅरंटी देणार आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीही तीच मागणी आहे. 

प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर आरोप केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज देशात दररोज 30 शेतकरी आत्महत्या करत आहेत. भाजपाच्या राजवटीत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि उपकरणांवर जीएसटी वसूल केला जातो."

"10 वर्षांत ना शेतकऱ्यांना एमएसपी मिळाला ना त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा एक पैसाही माफ झाला नाही, तर काही उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ झाले. काँग्रेस सरकारमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. कृषी उपकरणे जीएसटीमुक्त असतील."

"एमएसपीची कायदेशीर गॅरंटी असेल. पिकांच्या नुकसानीबाबत 30 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. नवीन आयात-निर्यात धोरण केले जाईल. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे 72,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. काँग्रेस पुन्हा येईल. एमएसपी, कर्जमाफी आणि चांगल्या उत्पन्नाच्या गॅरंटीसह समृद्धी येईल" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाFarmerशेतकरीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४