शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

Priyanka Gandhi : "भाजपाच्या राजवटीत 1 लाख शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या; काँग्रेसचं सरकार आलं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:13 IST

Priyanka Gandhi And BJP : प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी सांगितलं की, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले ना एमएसपी दिला गेला. काँग्रेसचे सरकार आल्यास केवळ एमएसपीची गॅरंटी देणार नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली जाईल असं आश्वासन प्रियंका यांनी दिलं आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, यावेळी प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं देत आहे. असंच आश्वासन काँग्रेसने दिलं आहे, ज्यात म्हटलं आहे की, ते शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर गॅरंटी देणार आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीही तीच मागणी आहे. 

प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर आरोप केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज देशात दररोज 30 शेतकरी आत्महत्या करत आहेत. भाजपाच्या राजवटीत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि उपकरणांवर जीएसटी वसूल केला जातो."

"10 वर्षांत ना शेतकऱ्यांना एमएसपी मिळाला ना त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा एक पैसाही माफ झाला नाही, तर काही उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ झाले. काँग्रेस सरकारमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. कृषी उपकरणे जीएसटीमुक्त असतील."

"एमएसपीची कायदेशीर गॅरंटी असेल. पिकांच्या नुकसानीबाबत 30 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. नवीन आयात-निर्यात धोरण केले जाईल. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे 72,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. काँग्रेस पुन्हा येईल. एमएसपी, कर्जमाफी आणि चांगल्या उत्पन्नाच्या गॅरंटीसह समृद्धी येईल" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाFarmerशेतकरीcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४