शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

उत्तर प्रदेशात आघाडीसाठी दरवाजे बंद केले नाहीत; सरचिटणीस प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 9:12 AM

भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले.

लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये इतर पक्षांशी युती करण्याचे दरवाजे आम्ही बंद केलेले नाहीत. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष दुर्बल होईल असा कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही. मात्र, कोणाशी युती करणार किंवा नाही याबद्दल इतक्या लवकर काही सांगणे योग्य होणार नाही. भाजपला पराभूत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आगामी काळातील स्थिती पाहूनच काँग्रेस आपली रणनीती ठरविणार आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांच्या काळात काँग्रेसने उत्तर प्रदेशात खूप मेहनत घेऊन काम केले आहे. ग्रामपंचायतींच्या स्तरापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे विणले आहे. त्यामुळे काँग्रेस आता संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल. 

प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक आहेत अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्याबद्दल प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी उत्तर प्रदेशला वारंवार भेटी देत असते. मी व माझा भाऊ राहुल गांधी फारशा गांभीर्याने राजकारण करत नाही असा गैरसमज भाजप पसरवत असतो. मात्र, त्याकडे आम्ही अजिबात लक्ष देणार नाही. मी उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष करते असा खोडसाळ प्रचार भाजपकडून केला जातो. मात्र, गेल्या १८ महिन्यांत प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर काँग्रेसने आवाज उठविला आहे, हे नागरिकांना दिसून येईल.

भीती दूर करा 

प्रियांका गांधी यांनी शनिवारी सांगितले की, काँग्रेस कार्यकर्त्यांना मनातले भय बाजूला सारून २०२२ साली होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. त्यासाठी अहोरात्र काम करावे. नागरिकांच्या प्रश्नांवर २०१९ पासून काँग्रेसने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकcongressकाँग्रेसPriyanka Gandhiप्रियंका गांधी