शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नका; नरेंद्र मोदींना मनमोहन सिंहांचा सल्लावजा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 11:28 IST

15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे  कृतज्ञ आहोत. त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये, असे मनमोहन सिंग म्हणाले.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये, असे आवाहन करताना त्यांनी मोदींवर निशानाही साधला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या शब्दांची निवड सावधानतेने करावी असा सल्ला दिला आहे. मनमोहन सिंगांनी म्हटले आहे की, 15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे  कृतज्ञ आहोत. त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये. 

आज आपण इतिहासातील एका नाजूक वळणावर उभे आहोत. आपल्या सरकारचे निर्णय आणि सरकारने उचललेली पाऊले भविष्यातील पिढ्यांनी आपले कसे आकलन करावे हे ठरवणार आहेत. जे देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याचे मोठे दायित्व आहे. आपल्या लोकशाहीमध्ये हे दायित्व पंतप्रधानाचे असते. यामुळे पंतप्रधानांनी आपल्या शब्दांद्वारे देशावर होणारे परिणाम, रणनीती, सुरक्षा, भौगोलिक हित आदींच्या परिणामांसाठी खूप सावध रहायला हवे, असा सल्ला सिंग यांनी दिला आहे. 

चीनने एप्रिल 2020 पासून आजपर्यंत भारतीय सीमेमध्ये गलवान घाटी आणि पेंगाँग शो लेक परिसरात अनेकदा घुसखोरी केली आहे. आम्ही ना ही त्यांच्या धमक्यांना भीक घालणार, नाही त्यांच्या दबावापुढे झुकणार आहोत. देशाच्या अखंडतेबाबत कोणताही समझोता करण्याच येणार नाही. पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यातून चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नये. तसेच सरकारचे सर्व विभाग या संकटाला एकत्रितपणे कसे सामोरे जातील, हे पहावे, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला. 

एकजूट व्हायची वेळही वेळ चीनविरोधात साऱ्या देशाने एकजूट होण्याची आहे. तरच चीनला चोख प्रत्यूत्तर देता येऊ शकेल. भ्रामक प्रचार कधीही कूटनीती आणि मजबूत नेतृत्वाला पर्याय असू शकत नाही, हे लक्षात ठेवावे. खोटे पसरवून सत्य कधीही लपविले जाऊ शकत नाही, असेही मनमोहन सिंग म्हणाले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

देशाशी नडला, महाराष्ट्राने झोडला! चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससह तीन प्रकल्प थांबवले

चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग

मगरमिठी! निम्म्याहून अधिक जगावर चीनच्या कर्जाचा डोंगर; भारतात एवढा नंबर

High अलर्ट! भारतावर सर्वांत मोठ्या सायबर हल्ल्याची शक्यता; मोठ्या संकटाचा इशारा

२५ हजारांपेक्षाही स्वस्त किंमतीत OnePlus चा फोन येणार; एकापेक्षा एक धासू फिचर देणार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीManmohan Singhमनमोहन सिंगchinaचीनladakhलडाख