शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दांडीबहाद्दर मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली सक्त ताकीद; हजर राहा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 12:11 IST

खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही खासदारांनी काम करावं.

ठळक मुद्देभाजपाची संसदीय दलाची बैठक आज पार पडली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं खासदारांना मार्गदर्शन गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीच्या संसदीय दलाची बैठक मंगळवारी संसदेच्या लायब्रेरी बिल्डींगमध्ये पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना समाजसेवा करण्याचा सल्ला दिला तसेच मंत्र्यांना सक्त ताकीद दिल्याचं पाहायला मिळालं.

मंत्रालयाच्या कार्यालयात मंत्री उपस्थित राहत नाही त्यावरुन विरोधी पक्षाची तक्रार आहे. जे मंत्री कार्यालयीन वेळेत मंत्रालयात गैरहजर राहतात अशा मंत्र्यांची नावे मागविली असून त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहे अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना दिली. 

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात काहीतरी नवीन करण्याचा विचार करावा. राजकारणासोबतच सामाजिक कार्यातही खासदारांनी काम करावं. दुर्गम भागातील पसरणाऱ्या आजारावर खासदाराने काम करणं गरजेचे आहे असं पंतप्रधानांनी सांगितले. 

दरम्यान मंत्री कार्यालयात उपस्थित राहत नाही यावरुन पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त करत जे मंत्री कार्यालयात नेहमी गैरहजर राहतील अशा मंत्र्यांची नावे मला द्यावीत. मला सगळ्यांना बरोबर करता येते. राज्यसभा आणि लोकसभेत मंत्र्यांना दोन-दोन तास ड्युटी असते तरीही अनेकदा मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत. त्याबद्दल विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली आहे. त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दांडी मारणाऱ्या मंत्र्यांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच खासदारांनीही अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणं सक्तीचं आहे असं त्यांनी सांगितले.  

 

मागील संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी खासदारांना सुनावले होते. चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात राम, सीता, लक्ष्मण हे काही काळ पंचवटीत राहिले होते. सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजपच्या सर्व खासदारांनी नियमित हजेरी लावली पाहिजे. त्यांनी जनकल्याणासाठी झटले पाहिजे. त्याकरिता ते ओळखले गेले पाहिजेत. अरेरावी व गैरवर्तनाच्या घटनांमुळे भाजपचे नाव खराब होते. एखाद्याकडून चूक घडली तर त्याने माफी मागण्याची तयारीही दर्शविली पाहिजे.

लोकसभेमध्ये तिहेरी तलाकविरोधी नवे विधेयक मांडण्यात आले त्यावेळी सभागृहात कमी संख्येने भाजप खासदार हजर होते. त्याविषयीही पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली होती.  तसेच भाजप कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथमध्ये किमान पाच झाडे लावावीत, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत दिला होता. या वृक्षलागवड कार्यक्रमाला त्यांनी पंचवटी असे नाव दिले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाministerमंत्रीMember of parliamentखासदार