शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

आई सोबत का राहत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं हे उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 17:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आई त्यांच्या सोबत का राहत नाही, या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचेही उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिले. दिल्लीतील पंतप्रधान आवासमधील या एवढ्या मोठ्या घरात तुम्ही राहता. मग तुमची आई-भाऊ सोबत राहावेत, असे तुम्हाला वाटत नाही का, अशी विचारणा केली असता मोदी म्हणाले की, ''जर मी पंतप्रधान बनून घरातून बाहेर पडलो असतो तर कुटुंबीयांना सोबत आणावे असे, वाटले असते. मात्र मी खूप लहान वयात घर सोडले. त्यानंतर जीवनात बदल झाला. तसेच माझे प्रशिक्षणही त्याच पद्धतीने झाले आहे. ज्यावेळी घर सोडले तेव्हा खूप त्रास झाला होता. मात्र आता सवय झावी आहे. मनाला वाटलं तेव्हा आईला बोलावून घेतले. तिच्यासोबत काही दिवस व्यतित केले. आता जेव्हा जेव्हा मी आईला भेटतो तेव्हा ती सव्वा रुपया माझ्या हातावर ठेवते. मग सांगते की माझ्यामागे वेळ वाया का घालवत आहेस. मी इथे राहून काय करू. गावात लोक येत जात असतात. गप्पागोष्टी होतात. तसेच मी सुद्धा तीला फार वेळ देऊ शकत नाही.''  यावेळी नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो. यावेळी मोदींच्या निद्रेसंदर्भातही अक्षयनं प्रश्न विचारला. तुम्ही 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, की माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं.तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक