शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

आई सोबत का राहत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं हे उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 17:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आई त्यांच्या सोबत का राहत नाही, या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचेही उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिले. दिल्लीतील पंतप्रधान आवासमधील या एवढ्या मोठ्या घरात तुम्ही राहता. मग तुमची आई-भाऊ सोबत राहावेत, असे तुम्हाला वाटत नाही का, अशी विचारणा केली असता मोदी म्हणाले की, ''जर मी पंतप्रधान बनून घरातून बाहेर पडलो असतो तर कुटुंबीयांना सोबत आणावे असे, वाटले असते. मात्र मी खूप लहान वयात घर सोडले. त्यानंतर जीवनात बदल झाला. तसेच माझे प्रशिक्षणही त्याच पद्धतीने झाले आहे. ज्यावेळी घर सोडले तेव्हा खूप त्रास झाला होता. मात्र आता सवय झावी आहे. मनाला वाटलं तेव्हा आईला बोलावून घेतले. तिच्यासोबत काही दिवस व्यतित केले. आता जेव्हा जेव्हा मी आईला भेटतो तेव्हा ती सव्वा रुपया माझ्या हातावर ठेवते. मग सांगते की माझ्यामागे वेळ वाया का घालवत आहेस. मी इथे राहून काय करू. गावात लोक येत जात असतात. गप्पागोष्टी होतात. तसेच मी सुद्धा तीला फार वेळ देऊ शकत नाही.''  यावेळी नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो. यावेळी मोदींच्या निद्रेसंदर्भातही अक्षयनं प्रश्न विचारला. तुम्ही 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, की माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं.तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक