शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आई सोबत का राहत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं हे उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 17:56 IST

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी आई त्यांच्या सोबत का राहत नाही, या अनेकांना पडलेल्या प्रश्नाचेही उत्तर नरेंद्र मोदी यांनी दिले. दिल्लीतील पंतप्रधान आवासमधील या एवढ्या मोठ्या घरात तुम्ही राहता. मग तुमची आई-भाऊ सोबत राहावेत, असे तुम्हाला वाटत नाही का, अशी विचारणा केली असता मोदी म्हणाले की, ''जर मी पंतप्रधान बनून घरातून बाहेर पडलो असतो तर कुटुंबीयांना सोबत आणावे असे, वाटले असते. मात्र मी खूप लहान वयात घर सोडले. त्यानंतर जीवनात बदल झाला. तसेच माझे प्रशिक्षणही त्याच पद्धतीने झाले आहे. ज्यावेळी घर सोडले तेव्हा खूप त्रास झाला होता. मात्र आता सवय झावी आहे. मनाला वाटलं तेव्हा आईला बोलावून घेतले. तिच्यासोबत काही दिवस व्यतित केले. आता जेव्हा जेव्हा मी आईला भेटतो तेव्हा ती सव्वा रुपया माझ्या हातावर ठेवते. मग सांगते की माझ्यामागे वेळ वाया का घालवत आहेस. मी इथे राहून काय करू. गावात लोक येत जात असतात. गप्पागोष्टी होतात. तसेच मी सुद्धा तीला फार वेळ देऊ शकत नाही.''  यावेळी नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. आमच्या घरात इस्त्री नव्हतीच म्हणूनच मग कपड्यांना प्रेस करण्यासाठी तांब्यामध्ये कोळसा टाकायचो. ते कपडे परिधान करून मगच बाहेर जात होतो. यावेळी मोदींच्या निद्रेसंदर्भातही अक्षयनं प्रश्न विचारला. तुम्ही 3 ते 4 तास फक्त झोपता, पण शरीराला कमीत कमी 7 तासांची झोप हवीच. त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ओबामा मला भेटले तेव्हा त्यांनीही याच मुद्द्यावरून माझ्याशी वाद घातला. कारण ते माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, की माझं ऐकलं की नाही, झोपेची वेळ वाढवली की नाही. अक्षयनं मोदींना संन्यासी किंवा सोल्जर यापैकी काय बनायला आवडेल, असा प्रश्न विचारला, त्यावर मोदी म्हणाले, जेव्हा कोणताही लष्कराचा अधिकारी युनिफॉर्ममध्ये जाताना दिसतो, तेव्हा लहान मुलांसारखा मी त्याला सलाम करतो. इतकंच नव्हे 1962च्या युद्ध छेडलं गेलं होतं.तेव्हा देशासाठी प्राण देण्याचं मनोमन ठरवून टाकलं होतं. तेव्हाच मी वाचलं की गुजरातमधल्या सैनिक शाळेत प्रवेश सुरू आहे. तेव्हा वडिलांना मी सांगितलं की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे, त्या शाळेत टाका. ते म्हणाले, शाळेत टाकण्याएवढे आपल्याकडे पैसे नाहीत. तू जामनगरला कसा जाणार, तुला कोण घेऊन जाणार आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक