शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
3
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
4
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
5
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
6
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
7
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
8
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
9
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
10
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
11
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
12
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
13
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
14
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
15
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
16
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
17
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
18
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
19
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
20
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
Daily Top 2Weekly Top 5

“भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय जोडले गेले”: पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 13:05 IST

Pm Narendra Modi First Speech In G20 Summit: जी-२० शिखर परिषदेला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी न करता ‘भारत’ अशी करुन दिली.

Pm Narendra Modi First Speech In G20 Summit: देशात जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेच्या सुरुवातीला सर्व देशांच्या नेत्यांचे, प्रमुखांचे स्वागत केले. तसेच भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय या परिषदेशी जोडले गेले, असे नमूद केले. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी न करता ‘भारत’ अशी करुन दिली. भारत नावाची पाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनासमोर लावण्यात आली.

२१ व्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ आहे. या काळात अनेक वर्षांपासूनची आव्हाने आपल्यासमोर उभी आहेत आणि या समस्यातून तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे आशेने पाहिले जात आहेत. यासाठी मानवकेंद्रीत दृष्टिकोन ठेवून प्रत्येकाला जबाबादारीने पुढे जायचे आहे. यासाठी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’चा मंत्र आपल्या सर्वांसाठी एक मार्गदर्शक बनू शकतो, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

भारतात जी-२० जनतेची परिषद झाली, कोट्यवधी भारतीय जोडले गेले

भारताचे जी २० परिषदेचे अध्यक्षपद देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर समावेशकता आणि सर्वांना सोबत घेण्याचे प्रतिक झाले आहे. देशातील ६० शहरांमध्ये २०० हून अधिक बैठका झाल्या. भारतात जी-२० जनतेची परिषद झाली आहे. कोट्यावधी भारतीय या परिषदेबरोबर जोडले गेले आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार असो, उत्तर आणि दक्षिणमधील विभागणी असो, पूर्व आणि पश्चिममधील दुरावा असो, अन्न, इंधन आणि खते यांचे व्यवस्थापन असो, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य, उर्जा आणि पाणी सुरक्षा असो, वर्तमानासह भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला या आव्हानांवर उपाययोजना करण्याकडे वाटचाल करावी लागणार आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

या जी २० शिखर परिषदेला सुरुवात करुया

आपण ज्या ठिकाणी जमलेलो आहोत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर ‘मानवतेचे कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केले जायला हवे’, असा संदेश देण्यात आला आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीने हा संदेश जगाला दिला होता. या संदेशानिशी आपण या जी २० शिखर परिषदेला सुरुवात करुया, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. 

 

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानIndiaभारतIndiaभारत