शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या कबुलीनंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 31, 2020 12:07 IST

पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्देआज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.सुरक्षादलाचे मनोबल वाढवा, राजकारण करू नका - मोदी

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने दिलेल्या कबुलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. मोदी सध्या गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्ताने ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “आज येथे निमलष्करी दलाचे संचलन पाहताना पुलवामा हल्ल्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. या हल्ल्यात आपल्या वीर जवानांना होतात्म्य आले. मात्र, त्यावेळी संपूर्ण देश दुःखात असताना काही लोक या दुखात सहभागी नव्हते. ते पुलवामा हल्ल्यात आपला राजकीय स्वार्थ शोधत होते. हे देश कधीही विसरणार नाही. त्यावेळी केलेली वक्तव्ये आणि राजकारण देश कधीच विसरू शकत नाही. देशावर एवढा मोठा घाव झालेला असताना, काही लोकांना यात राजकारण दिसत होते. अशा पक्षाच्या नेत्यांवर बरसताना मोदी म्हणाले, ते व्हा ते सर्व आरोप झेलत होते, अनेक वाईट गोष्टी एकत राहिले. माझ्या मनावर वीर जवानाच्या हौतात्म्याचा घाव होता. मात्र, काही दिवसांपूर्वी शेजारील देशांतून ज्या बातम्या आल्या, तेथील संसदेत ज्याप्रकारे सत्य स्वीकारले गेले, त्याने या लोकांचा खरा चेहरा देशांसमोर आला आहे.”

काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आले आहेत; फ्रान्स कार्टून वादावर मोदींचं भाष्य, म्हणाले...काँग्रेसचे नव न घेता पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, हे विरोधकांनी दाखवले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर झालेले राजकारण याचे मोठे उदाहरण आहे.  तेव्हा काय-काय बोलले गेले, कशा प्रकारची विधाने केली गेली, हे देश कधीही विसरू शकत नाही. 

सुरक्षादलाचे मनोबल वाढवा, राजकारण करू नका -पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अशा काही राजकीय पक्षांना विनंती करतो, की देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्या देशाच्या संरक्षण दलाच्या मनोबलासाठी कृपा करून, अशा प्रकारचे राजकारण करू नका. आपल्या स्वार्थासाठी आपण नकळत देशविरोधी शक्तींचा हातचे खेळणे होऊन, ना देशाचे हित करू शकाल, ना आपल्या पक्षाचे, असेही मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, एक गोष्ट नेहमीच लक्षात असू द्या, की आपल्या सर्वांसाठी देशहित सर्वात महत्वाचे आहे. आपण जेव्हा सर्वांच्या हिताचा विचार करू तेव्हा आपलीही प्रगती आणि उन्नती होईल. आपली विविधताच आपले अस्तित्व आहे. मोदी म्हणाले, आपण एक असू तर असाधारण असू. मात्र सहकाऱ्यांनो, हेही लक्षात असू द्या, की भारताची ही एकतेची ताकद दुसऱ्यांना नेहमीच खटकत असते, असेही मोदी म्हणाले. तत्पूर्वी, मोदींनी केवडिया येथील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ जाऊन सरदार वल्लभभाई पटेलांना भिवादन केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSoldierसैनिकBJPभाजपाcongressकाँग्रेस