शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

पायाभूत सुविधांत क्रांतिकारी बदल घडवणारी योजना, ‘गतिशक्ती’वर पंतप्रधान मोदी यांनी काढले गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:31 IST

पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (पीएमजीएस-एनएमपी) विविध आर्थिक क्षेत्रांना मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला होता. ही योजना रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळे, वाहतूक आदी पायाभूत सुविधा यांच्याद्वारे चालवली जाणारी योजना आहे.

नवी दिल्ली : ‘पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडविण्याच्या उद्देशाने एक परिवर्तनकारी योजना म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये जलद आणि अधिक परिणामकारक विकास झाला आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्यक्त केले. 

पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन (पीएमजीएस-एनएमपी) विविध आर्थिक क्षेत्रांना मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी १३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू करण्यात आला होता. ही योजना रेल्वे, रस्ते, बंदरे, जलमार्ग, विमानतळे, वाहतूक आदी पायाभूत सुविधा यांच्याद्वारे चालवली जाणारी योजना आहे.

नव्या संधींची निर्मिती- पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, या माध्यमातून विलंब कमी झाला आहे आणि अनेक लोकांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.- मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्टमध्ये केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनाही टॅग केले. गोयल यांनी या योजनेची तीन वर्षे पूर्ण झाल्याबाबत प्रशंसा केली.    

नवनिर्मितीला प्रोत्साहन पीएमजीएस-एनएमपीच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त  मोदींनी येथील भारत मंडपम येथे असलेल्या 'पीएम गतिशक्ती केंद्राला' अचानक भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या योजनेमुळे विकसित भारताचे आमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने भारत वेगाने वाटचाल करत आहे. यामुळे प्रगती, उद्योजकता आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल. 

याचा उद्देश भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवून आणणे आणि सर्व क्षेत्रांमध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम विकासाला चालना देणे आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा