शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:33 IST

Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. यादरम्यान संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला. तसेच मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. मणिपूरमध्ये आता हिंसाचार कमी होत आहे. तसेच शांतता प्रस्थापित होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी राजकारण करू नये. जे लोक मणिपूरच्या विषयावरून आगीत तेल ओतत आहेत. त्यांना मणिपूर एक दिवस नाकारेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये लावण्यात आलेल्या राष्ट्रपती शासनाची माहितीही दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेमध्ये संबोधित करताना म्हणाले की, मणिपूरबाबत मागच्या अधिवेशनात मी सविस्तर बोललो होतो. त्यावेळी उल्लेख केलेल्या बाबींची मी आज पुनरावृत्ती करू इच्छितो. मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तिथे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत ११ हजारांहून अधिक एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत. मणिपूर हे एक लहान राज्य आहे. ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे शांततेवर विश्वास ठेवणं शक्य होत आहे. आज मणिपूरमधील बहुतांश भागात सामान्यपणे शाळा सुरू आहेत. कॉलेज सुरू आहेत. तसेच कार्यालये आणि उद्योग संस्थाही सुरू आहेत.

यावेळी काँग्रेसच्या सत्ताकाळात मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि राष्ट्रपती राजवटीची आठवणही करून दिली. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांनी हे विसरू नये की, याच कारणामुळे मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लावावी लागली होती. तरीही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९९३ मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर जवळपास ५ वर्षे ही अशांततेची मालिका सुरू होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीManipur Violenceमणिपूर हिंसाचार