शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:33 IST

Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. यादरम्यान संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला. तसेच मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. मणिपूरमध्ये आता हिंसाचार कमी होत आहे. तसेच शांतता प्रस्थापित होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी राजकारण करू नये. जे लोक मणिपूरच्या विषयावरून आगीत तेल ओतत आहेत. त्यांना मणिपूर एक दिवस नाकारेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये लावण्यात आलेल्या राष्ट्रपती शासनाची माहितीही दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेमध्ये संबोधित करताना म्हणाले की, मणिपूरबाबत मागच्या अधिवेशनात मी सविस्तर बोललो होतो. त्यावेळी उल्लेख केलेल्या बाबींची मी आज पुनरावृत्ती करू इच्छितो. मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तिथे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत ११ हजारांहून अधिक एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत. मणिपूर हे एक लहान राज्य आहे. ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे शांततेवर विश्वास ठेवणं शक्य होत आहे. आज मणिपूरमधील बहुतांश भागात सामान्यपणे शाळा सुरू आहेत. कॉलेज सुरू आहेत. तसेच कार्यालये आणि उद्योग संस्थाही सुरू आहेत.

यावेळी काँग्रेसच्या सत्ताकाळात मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि राष्ट्रपती राजवटीची आठवणही करून दिली. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांनी हे विसरू नये की, याच कारणामुळे मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लावावी लागली होती. तरीही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९९३ मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर जवळपास ५ वर्षे ही अशांततेची मालिका सुरू होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीManipur Violenceमणिपूर हिंसाचार