शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 15:33 IST

Narendra Modi Speech in Rajya Sabha: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मणिपूरच्या (Manipur Violence) मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये आणि आज राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. यादरम्यान संसदेतील दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून जोरदार गोंधळ घातला. तसेच मणिपूरच्या मुद्द्यावरून पंतप्रधानांना घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावर आज राज्यसभेत सविस्तर भाष्य केलं. तसेच मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत देशवासीयांना माहिती दिली. मणिपूरमध्ये आता हिंसाचार कमी होत आहे. तसेच शांतता प्रस्थापित होत आहे. काँग्रेसने या प्रकरणी राजकारण करू नये. जे लोक मणिपूरच्या विषयावरून आगीत तेल ओतत आहेत. त्यांना मणिपूर एक दिवस नाकारेल, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच काँग्रेसला त्यांच्या कार्यकाळात मणिपूरमध्ये लावण्यात आलेल्या राष्ट्रपती शासनाची माहितीही दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेमध्ये संबोधित करताना म्हणाले की, मणिपूरबाबत मागच्या अधिवेशनात मी सविस्तर बोललो होतो. त्यावेळी उल्लेख केलेल्या बाबींची मी आज पुनरावृत्ती करू इच्छितो. मणिपूरमधील परिस्थिती सामान्य करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. तिथे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्याबाबत ११ हजारांहून अधिक एफआयआर नोंदवल्या गेल्या आहेत. मणिपूर हे एक लहान राज्य आहे. ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घट होत आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. त्यामुळे शांततेवर विश्वास ठेवणं शक्य होत आहे. आज मणिपूरमधील बहुतांश भागात सामान्यपणे शाळा सुरू आहेत. कॉलेज सुरू आहेत. तसेच कार्यालये आणि उद्योग संस्थाही सुरू आहेत.

यावेळी काँग्रेसच्या सत्ताकाळात मणिपूरमध्ये झालेला हिंसाचार आणि राष्ट्रपती राजवटीची आठवणही करून दिली. मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या लोकांनी हे विसरू नये की, याच कारणामुळे मणिपूरमध्ये १० वेळा राष्ट्रपती राजवट लावावी लागली होती. तरीही राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९९३ मध्ये अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर जवळपास ५ वर्षे ही अशांततेची मालिका सुरू होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपाcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीManipur Violenceमणिपूर हिंसाचार