शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करण्यात व्यस्त, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:39 IST

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देहवाई दलाच्या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवातदेशाला मजबूत करण्याची वेळ आलेली असताना मोदी मात्र बूथ मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसने केला

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे जबदस्त एअर स्ट्राइक करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र या कारवाईनंतर आता देशात राजकारणाला सुरुवात झाली आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याची गरज होती त्याचवेळी मोदी हे भाजपाच्या बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. देशाला मजबूत करण्याची वेळ आलेली असताना मोदी मात्र बूथ मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.काँग्रेस प्रवक्ते आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ''पक्षा पेक्षा देश मोठा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमधून वारंवार सांगत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांची वर्तणूक ही पक्ष देशापेक्षा मोठा असल्यासारखी आहे. सध्या देशातील वातावरण हे राजकारणापेक्षा देशभक्तीमय झालेले आहे अशावेळी देशाला संबोधित करण्यापेक्षा बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणे मोदींना का गरजेचे वाटले, हा एक प्रश्नच आहे.'' असे मनीष तिवारी म्हणाले. तसेच ज्या दिवशी भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक केले त्याच दिवशी भाजपा अध्यक्ष पंतप्रधानांसाठी मते मागत होते, ही वेळ काय राजकारण करण्याची आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी मनीष तिवारी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केलेल्या वक्तव्याचाही उल्लेख केला. ''भाजपाचे कर्नाटकमधील  अध्यक्ष या कारवाईमुळे राज्यात भाजपाला 28 पैकी 22 जागा मिळतील, असा दावा करत आहेत. तर गिरिराज सिंह म्हणताहेत की 3 मार्चच्या एनडीएच्या सभेत जो सहभागी होणार नाही त्याने पाकिस्तानमध्ये गेले पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्ये पाकिस्ताच्या अपप्रचाराला मजबूत कर आहेत.'' असा आरोपही तिवारी यांनी केला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी