शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

४८ जागांवर लोकसभेची तयारी, पण...; नाना पटोलेंनी सांगितला दिल्ली बैठकीचा वृत्तांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 18:40 IST

महाराष्ट्र राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवरील चर्चा बैठकीत झाली, या बैठकीला राज्यातील २५ नेते उपस्थिते होते.

मुंबई - भाजपानंतर आता काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी रणनिती आखायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे सर्वाधिक ४८ लोकसभा सीट असलेलं राज्य आहे. त्यामुळे, राष्ट्रीय पक्षांची नजर महाराष्ट्रावर आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची आज राजधानि दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, केसी वेणुगोपाल तसेच राहुल गांधी देखील या बैठकीत हजर होते. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा आणि काही मह्त्त्वाचे निर्णय झाले. 

महाराष्ट्र राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवरील चर्चा बैठकीत झाली, या बैठकीला राज्यातील २५ नेते उपस्थिते होते. बैठकीचा वृत्तांत सांगताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही राज्यातील लोकसभेच्या ४८ जांगासाठीची तयारी करत आहोत. मात्र, आघाडीचा निर्णय झाल्यानंतर जागावाटपात ज्या पक्षासाठी जागा जाईल, तेथील पक्षाच्या उमेदवाराल आमचा पाठिंबा राहिला. आमच्या पक्षाच्या पाठिंब्यामुळे, मदतीमुळे संबंधित उमेदवाराला निवडणूक सोपी होईल, असे नाना पटोले यांनी म्हटले. महाराष्ट्रात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, येथील जनतेच्या मनात शाहू-फुले-आंबेडकरांची विचारधारा आहे. त्यामुळे, जो कोणी उमेदवार असेल त्यांस आमचा फायदाच होईल, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. 

महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर पक्ष संघटना वाढीसाठी काम करण्यात येणार आहे. तसेच, पावसाळा संपल्यानंतर काँग्रेसच्यावतीने बस यात्रा काढण्यात येणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या आणि राज्यात तीन-तिघाडा बनललेल्या सरकारमध्ये कशारितीने खोक्यांचा वापर केला हे आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले, बेरोजगारी वाढली आहे, महागाईही वाढली आहे. हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ. तसेच, भाजपा सत्तेसाठी काहीही करू शकते हेही लोकांना सांगू, असे नाना पटोले यांनी बैठकीनंतर सांगितले.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?

या बैठकीचा फोटो शेअर करत खर्गे यांनी ट्विट केले की, “भाजपने वॉशिंग मशीन वापरgन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचे काम केले आहे. या राजकीय खेळाला काँग्रेस पक्ष सडेतोड उत्तर देईल. भाजपकडून जनादेशावर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांना महाराष्ट्रातील जनता सडेतोड राजकीय उत्तर देईल.आमचे नेते आणि कार्यकर्ते महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे सरकार परत मिळवून देतील. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आम्ही आमचे स्थान टिकवून ठेवले आहे. महाराष्ट्र आणि काँग्रेस यांच्यातील वैभवशाली नाते आम्ही आणखी दृढ करू."

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेMumbaiमुंबईElectionनिवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा