शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

Encounter Statistics in India: दर महिन्याला १० गुन्हेगारांचा 'खेळ खल्लास'! एन्काऊंटरमध्ये भारतातील 'ही' दोन राज्य सर्वात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 18:12 IST

पोलिसांनी आज एका शूटरला चकमकीत ठार केलं

Encounter Statistics in India: उमेश पाल हत्या प्रकरणातील आणखी एका शूटरला प्रयागराज पोलिसांनी चकमकीत ठार केले. आज ज्याची चकमक झाली, त्याचे नाव विजय चौधरी उर्फ ​​उस्मान आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की चकमकीत तो जखमी झाला होता, त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. उमेश पाल यांची २४ फेब्रुवारी रोजी घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात उमेश पालचे दोन सुरक्षा रक्षकही मारले गेले. उमेश पाल हे २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होते. राजू पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी माजी खासदार अतिक अहमद सध्या गुजरात तुरुंगात आहे.

कोण होता विजय चौधरी उर्फ उस्मान?

उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी पतीच्या हत्येप्रकरणी अतिक अहमद, त्यांची पत्नी शाइस्ता परवीन, भाऊ अशरफ, दोन मुले, गुड्डू मुस्लिम आणि गुलाम यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय चौधरी उर्फ ​​उस्मान, ज्याचा आज प्रयागराज पोलिसांनी पाठलाग करून एन्काऊंटर केला त्यानेच उमेश पाल यांच्यावर पहिली गोळी झाडल्याचा आरोप आहे.

धुमगंजचे एसएचओ राजेश कुमार मौर्य यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, विजय चौधरीच्या मानेवर, छातीत आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, चकमकीदरम्यान कॉन्स्टेबल नरेंद्र पाल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विजयच्या एन्काऊंटरवर पोलिसांनी दिलेल्या माहितीवर कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विजयची पत्नी म्हणते, "माझ्या पतीसह मलाही मारले पाहिजे होते, कारण माझ्या मागे कोणीही नाही त्यामुळे मी कोणासाठी जगायचे?"

दरम्यान, पोलीस चकमकीवर म्हणजे एन्काऊंटवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा अनेकदा केला जातो त्यामुळे चकमकीवर बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होतात आहेत. अशा स्थितीत पोलीस कोणावर गोळीबार कधी करू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान, जाणून घेऊया देशातील एन्काऊंटरबद्दलची आकडेवारी काय सांगते...

6 वर्षात 813 एन्काऊंटर- गेल्या वर्षी 23 मार्च रोजी देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी चकमकीबद्दलच्या मृत्यूची आकडेवारी दिली होती. ही आकडेवारी 1 एप्रिल 2016 ते 10 मार्च 2022 पर्यंतची होती. त्यानुसार 6 वर्षात 813 जणांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. यात छत्तीसगडमध्ये सर्वाधिक २६४ एन्काऊंटर झाले आहेत. तर उत्तर प्रदेशात 121 गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तर बिहारमध्ये २५ एन्काऊंटर झाले आहेत.

महिन्याला १० गुन्हेगारांचा एन्काऊंटर- सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, चकमकीत हत्येचे 813 प्रकरणांपैकी 459 निकाली काढण्यात आली आहेत, तर 354 प्रकरणांचा तपास सुरू आहे. म्हणजेच एकूण 6 वर्षात दर महिन्याला 10 गुन्हेगार चकमकीत मारले गेले.

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलीस चकमकीच्या 107 प्रकरणांमध्ये नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. या दरम्यान पीडितांना 7.16 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली.

टॅग्स :IndiaभारतPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार