शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Encounter Statistics in India: दर महिन्याला १० गुन्हेगारांचा 'खेळ खल्लास'! एन्काऊंटरमध्ये भारतातील 'ही' दोन राज्य सर्वात पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 18:12 IST

पोलिसांनी आज एका शूटरला चकमकीत ठार केलं

Encounter Statistics in India: उमेश पाल हत्या प्रकरणातील आणखी एका शूटरला प्रयागराज पोलिसांनी चकमकीत ठार केले. आज ज्याची चकमक झाली, त्याचे नाव विजय चौधरी उर्फ ​​उस्मान आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की चकमकीत तो जखमी झाला होता, त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. उमेश पाल यांची २४ फेब्रुवारी रोजी घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात उमेश पालचे दोन सुरक्षा रक्षकही मारले गेले. उमेश पाल हे २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होते. राजू पाल हत्याकांडातील मुख्य आरोपी माजी खासदार अतिक अहमद सध्या गुजरात तुरुंगात आहे.

कोण होता विजय चौधरी उर्फ उस्मान?

उमेश पाल यांची पत्नी जया पाल यांनी पतीच्या हत्येप्रकरणी अतिक अहमद, त्यांची पत्नी शाइस्ता परवीन, भाऊ अशरफ, दोन मुले, गुड्डू मुस्लिम आणि गुलाम यांच्यासह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजय चौधरी उर्फ ​​उस्मान, ज्याचा आज प्रयागराज पोलिसांनी पाठलाग करून एन्काऊंटर केला त्यानेच उमेश पाल यांच्यावर पहिली गोळी झाडल्याचा आरोप आहे.

धुमगंजचे एसएचओ राजेश कुमार मौर्य यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, विजय चौधरीच्या मानेवर, छातीत आणि मांडीला गोळ्या लागल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, चकमकीदरम्यान कॉन्स्टेबल नरेंद्र पाल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, विजयच्या एन्काऊंटरवर पोलिसांनी दिलेल्या माहितीवर कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विजयची पत्नी म्हणते, "माझ्या पतीसह मलाही मारले पाहिजे होते, कारण माझ्या मागे कोणीही नाही त्यामुळे मी कोणासाठी जगायचे?"

दरम्यान, पोलीस चकमकीवर म्हणजे एन्काऊंटवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा अनेकदा केला जातो त्यामुळे चकमकीवर बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण होतात आहेत. अशा स्थितीत पोलीस कोणावर गोळीबार कधी करू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच दरम्यान, जाणून घेऊया देशातील एन्काऊंटरबद्दलची आकडेवारी काय सांगते...

6 वर्षात 813 एन्काऊंटर- गेल्या वर्षी 23 मार्च रोजी देशाचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी चकमकीबद्दलच्या मृत्यूची आकडेवारी दिली होती. ही आकडेवारी 1 एप्रिल 2016 ते 10 मार्च 2022 पर्यंतची होती. त्यानुसार 6 वर्षात 813 जणांचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. यात छत्तीसगडमध्ये सर्वाधिक २६४ एन्काऊंटर झाले आहेत. तर उत्तर प्रदेशात 121 गुन्हेगारांचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तर बिहारमध्ये २५ एन्काऊंटर झाले आहेत.

महिन्याला १० गुन्हेगारांचा एन्काऊंटर- सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, चकमकीत हत्येचे 813 प्रकरणांपैकी 459 निकाली काढण्यात आली आहेत, तर 354 प्रकरणांचा तपास सुरू आहे. म्हणजेच एकूण 6 वर्षात दर महिन्याला 10 गुन्हेगार चकमकीत मारले गेले.

दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलीस चकमकीच्या 107 प्रकरणांमध्ये नुकसान भरपाईचे आदेश दिले होते. या दरम्यान पीडितांना 7.16 कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली.

टॅग्स :IndiaभारतPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार