शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र', पहिल्याच दिवशी पोहोचले 15 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 12:26 IST

प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.रुग्णालयात पहिल्याच दिवशी 15 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. केंद्रांमध्ये मुलांना लागलेले फोनचे आणि इंटरनेटचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. 

प्रयागराज - मोबाइल हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. एखाद्या वेळी मोबाइल विसरलो, हरवला अथवा चोरीला गेला तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. मात्र हल्ली मोबाइलचा सर्वच ठिकाणी सर्रार वापर केला जातो. त्याचं सर्वांना व्यसन लागलं आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. फोनच्या वेडापायी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. व्यसनमुक्ती केंद्राबाबत नेहमीच ऐकतो. मात्र आता 'मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र' सुरू करण्यात आले आहे. 

प्रयागराज येथील मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात मोबाइल व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात  मोबाइल गेम, इंटरनेट, टीव्ही आणि सोशल मीडिया याची मुलांना लागलेली सवय सोडवण्यासाठी काही उपचार केले जाणार आहेत. किशोरवयात मुलांच्या वागणुकीत होणाऱ्या बदलांसाठी मोबाइलचे व्यसन किंवा इंटरनेट हे मूळ कारण असल्याचं मनोरुग्णतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोतीलाल नेहरू विभागीय रुग्णालयात पहिल्याच दिवशी 15 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश हा जास्त आहे. 

डॉ. राकेश पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांची टिम यावर खूप दिवसांपासून काम करत होती. त्यानंतर हे केंद्र सुरू करण्यात आलं. पहिल्याच दिवशी 15 रुग्ण उपचारासाठी आले होते. त्यांना औषधासोबतच योग्य सल्ला देण्यात आला आहे. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे. केंद्रांमध्ये मुलांना लागलेले फोनचे आणि इंटरनेटचे व्यसन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. 

डॉक्टर ईशान्या राज यांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांसोबतच मोठ्या व्यक्तींना देखील फोनचे व्यसन लागले आहे. त्यांच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होत आहे. मोबाइल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सध्या सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी उपचार केले जातात. लोकांचं समुपदेशन केलं जातं. तर आठवड्यातील इतर दिवशी डॉक्टरांची टीम विभागात जाऊन मोबाइलच्या व्यसनाची लोकांना माहिती देऊन त्यापासून सावध करत आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाइलचा योग्य वापर करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.  

टॅग्स :MobileमोबाइलUttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेट