शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांचे ऐक्य आणि पदयात्रेद्वारे प्रशांत किशोर यांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 09:30 IST

चंद्रशेखर व जेपी दोन्ही भूमिका निभावण्याचा प्रयत्न.

शरद गुप्ता नवी दिल्ली : बिहारच्या सर्व विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याची आणि ३००० किलोमीटरची पदयात्रा काढण्याची घोषणा करून प्रशांत किशोर एकाच वेळी जयप्रकाश नारायण, हरकिशन सिंह सुरजीत व चंद्रशेखर यांची भूमिका बजावू पाहत असल्याची चर्चा आहे. वेगाने घोडदौड करणारा भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी चाणक्य बनण्याच्या ते प्रयत्नात आहेत.

संपूर्ण क्रांतीच्या घोषणेनंतर १९७५मध्ये जेपी यांनी बिहारच्या सर्व विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणले होते. हळूहळू त्यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या ऐक्याला जन्म दिला व त्यामुळे १९७७च्या निवडणुकीत जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले. हेच काम १९९६मध्ये माकपाचे सरचिटणीस हरकिशन सिंह सुरजीत यांनी केले. त्यांच्यामुळेच मुलायम सिंह यादव व लालूप्रसाद यादव आपसातील मतभेद असतानाही एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारांना समर्थन देण्यास तयार झाले होते. तर दुसरीकडे भारतात पदयात्रेद्वारे राजकीय ओळख निर्माण करण्याचा इतिहास राहिलेला आहे. 

१९८३ मध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी ४००० किलोमीटरची पदयात्रा काढून तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात राष्ट्रव्यापी वातावरण तयार केले होते.  आंध्र प्रदेशमध्ये २००३मध्ये वायएस राजशेखर रेड्डी (१५०० किलोमीटर), २०१३मध्ये चंद्राबाबू नायडू (१७०० किलोमीटर) व २०१९मध्ये जगनमोहन रेड्डी (३००० किलोमीटर) यांनी पदयात्रांद्वारे सरकारे उलथवली होती.

  • २०१४मध्ये तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह, अरविंद केजरीवाल व नितीशकुमार यांच्यासाठी निवडणूक रणनीती तयार केल्यावर प्रशांत किशोर २०२०मध्ये स्वत:चा पक्ष स्थापन करू इच्छित होते. 
  • ते १०० दिवसांत १० लाख युवकांना आपल्या ‘बात बिहार की’ मोहिमेशी जोडू इच्छित होते. परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी व जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी यशस्वी निवडणूक रणनीती बनवली होती.  

राजकारणात अयशस्वी 

  • प्रशांत किशोर जनता दल (यू)मध्ये सहभागी झाले होते व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले होते. परंतु पक्षातील जुन्या नेत्यांच्या विरोधामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला 
  • होता. 
  • अशीच काही स्थिती त्यांची काँग्रेसबाबतही झाली होती. मागील महिन्यात ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या समर्थकांच्या विरोधामुळे ते पक्षात सहभागी होऊ शकले नव्हते.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाPoliticsराजकारणIndiaभारत