शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

विरोधकांचे ऐक्य आणि पदयात्रेद्वारे प्रशांत किशोर यांचे भाजपला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 09:30 IST

चंद्रशेखर व जेपी दोन्ही भूमिका निभावण्याचा प्रयत्न.

शरद गुप्ता नवी दिल्ली : बिहारच्या सर्व विरोधी पक्षांना एकाच व्यासपीठावर आणण्याची आणि ३००० किलोमीटरची पदयात्रा काढण्याची घोषणा करून प्रशांत किशोर एकाच वेळी जयप्रकाश नारायण, हरकिशन सिंह सुरजीत व चंद्रशेखर यांची भूमिका बजावू पाहत असल्याची चर्चा आहे. वेगाने घोडदौड करणारा भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी चाणक्य बनण्याच्या ते प्रयत्नात आहेत.

संपूर्ण क्रांतीच्या घोषणेनंतर १९७५मध्ये जेपी यांनी बिहारच्या सर्व विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणले होते. हळूहळू त्यांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या ऐक्याला जन्म दिला व त्यामुळे १९७७च्या निवडणुकीत जनता पार्टीचे सरकार स्थापन झाले. हेच काम १९९६मध्ये माकपाचे सरचिटणीस हरकिशन सिंह सुरजीत यांनी केले. त्यांच्यामुळेच मुलायम सिंह यादव व लालूप्रसाद यादव आपसातील मतभेद असतानाही एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारांना समर्थन देण्यास तयार झाले होते. तर दुसरीकडे भारतात पदयात्रेद्वारे राजकीय ओळख निर्माण करण्याचा इतिहास राहिलेला आहे. 

१९८३ मध्ये माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी ४००० किलोमीटरची पदयात्रा काढून तत्कालीन इंदिरा गांधी सरकारच्या विरोधात राष्ट्रव्यापी वातावरण तयार केले होते.  आंध्र प्रदेशमध्ये २००३मध्ये वायएस राजशेखर रेड्डी (१५०० किलोमीटर), २०१३मध्ये चंद्राबाबू नायडू (१७०० किलोमीटर) व २०१९मध्ये जगनमोहन रेड्डी (३००० किलोमीटर) यांनी पदयात्रांद्वारे सरकारे उलथवली होती.

  • २०१४मध्ये तत्कालीन पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह, अरविंद केजरीवाल व नितीशकुमार यांच्यासाठी निवडणूक रणनीती तयार केल्यावर प्रशांत किशोर २०२०मध्ये स्वत:चा पक्ष स्थापन करू इच्छित होते. 
  • ते १०० दिवसांत १० लाख युवकांना आपल्या ‘बात बिहार की’ मोहिमेशी जोडू इच्छित होते. परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर त्यांनी एम. के. स्टालिन, ममता बॅनर्जी व जगनमोहन रेड्डी यांच्यासाठी यशस्वी निवडणूक रणनीती बनवली होती.  

राजकारणात अयशस्वी 

  • प्रशांत किशोर जनता दल (यू)मध्ये सहभागी झाले होते व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले होते. परंतु पक्षातील जुन्या नेत्यांच्या विरोधामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला 
  • होता. 
  • अशीच काही स्थिती त्यांची काँग्रेसबाबतही झाली होती. मागील महिन्यात ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या समर्थकांच्या विरोधामुळे ते पक्षात सहभागी होऊ शकले नव्हते.
टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाPoliticsराजकारणIndiaभारत