शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
3
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
4
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
5
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
6
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
7
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
8
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
9
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
10
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
11
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
12
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
13
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
14
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
15
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
16
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
17
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!
18
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
19
Bigg Boss 19: सलमानच्या शोची उपेंद्र लिमयेंना ऑफर? अभिनेता म्हणाला- "मला अनेकांनी विचारलं..."
20
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी

Prashant Kishor: "देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:08 IST

Prashant Kishor on Polarisation: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील ध्रुवीकरणाच्या राजकारणावर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोणत्याही पक्षाच्या जय-पराजयाकडे संपूर्ण ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील हिंदू आणि भाजपला मिळणाऱ्या मतदानावर मोठे वक्तव्य केले आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना किशोर म्हणाले की, "देशात 80 ते 82 टक्के लोकसंख्या हिंदू आहेत, पण तरीही भाजपला फक्त 40 टक्के मते मिळतात. अशा परिस्थितीत भाजप ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडणुका जिंकतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे," असे ते म्हणाले.

देशाच्या राजकारणात कथितरित्या वाढत्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "देशात ध्रुवीकरणाची बाब अतिशय अतिशयोक्त पद्धतीने मांडली जात आहे. आता ध्रुवीकरणाची पद्धत बदलली आहे. 15 वर्षांपूर्वी तु्म्ही कसे ध्रुवीकरण करायचा, ते आता बदलले आहे. पण, त्याचा प्रभाव जवळजवळ समान आहे. आम्ही निवडणुकीच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. या आधारावर आपण असे म्हणू शकतो की, ज्या निवडणुकीत सर्वाधिक ध्रुवीकरण होते, असे म्हटले जाते, त्यातही कोणत्याही पक्षाला कोणत्याही एका समाजाच्या 50-55 टक्के मतदारांची जमवाजमव करता येत नाही. ध्रुवीकरणाला निवडणूक हरण्याचे कारण सांगणारे चुकीचे आहेत, असा त्यांचा अर्थ आहे," असेही ते पुढे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "समजा तुम्ही हिंदू समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलात. हा समाज देशात बहुसंख्य आहे. जर हिंदू समाजातील ध्रुवीकरणाची पातळी 50 टक्क्यांवर पोहोचली, म्हणजे त्यातील 50 टक्के लोक एकाच पक्षाला मत देतात कारण ते त्या पक्षाच्या प्रभावाखाली असतात. पण इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, ध्रुवीकरणाने प्रभावित झालेल्या प्रत्येक हिंदूसोबत दुसरा हिंदू आहे ज्याला त्याचा फटका बसत नाही. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण निर्णायक आहे असे मानणे. यामुळे निवडणूक जिंकता येते किंवा हरता येते…असे मानणे चुकीचे आहे."

किशोर पुढे म्हणाले की, "जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांना असे अनेक लोक भेटतात जे म्हणतात की सर्व हिंदूंचे ध्रुवीकरण झाले आहे. पण वस्तुस्थिती काही औरच सांगते. भारतात भाजपला 38 टक्के मते मिळाली आहेत. एक मिनिट कल्पना करा आणि सांगा की हे सर्व मतदार हिंदुत्वाच्या प्रभावाने भाजपला मतदान करतात का? भाजपला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या देशातील एकूण हिंदूंच्या निम्म्याहून कमी आहे." नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, "या राज्यात भाजपला 40 टक्के मते मिळाली आहेत. तर राज्यात हिंदू लोकसंख्या 80-82 टक्के आहे. याचा अर्थ निम्म्याहून कमी हिंदूंनी भाजपला मतदान केले. येथे आपण असे म्हणू शकतो की ध्रुवीकरणाचा परिणाम होतो पण केवळ ध्रुवीकरणाच्या जोरावर एखादा पक्ष निवडणुका जिंकतो किंवा हरतो असे म्हणता येणार नाही."

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरElectionनिवडणूकHinduहिंदू