शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

Prashant Kishor: "देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:08 IST

Prashant Kishor on Polarisation: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील ध्रुवीकरणाच्या राजकारणावर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोणत्याही पक्षाच्या जय-पराजयाकडे संपूर्ण ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील हिंदू आणि भाजपला मिळणाऱ्या मतदानावर मोठे वक्तव्य केले आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना किशोर म्हणाले की, "देशात 80 ते 82 टक्के लोकसंख्या हिंदू आहेत, पण तरीही भाजपला फक्त 40 टक्के मते मिळतात. अशा परिस्थितीत भाजप ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडणुका जिंकतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे," असे ते म्हणाले.

देशाच्या राजकारणात कथितरित्या वाढत्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "देशात ध्रुवीकरणाची बाब अतिशय अतिशयोक्त पद्धतीने मांडली जात आहे. आता ध्रुवीकरणाची पद्धत बदलली आहे. 15 वर्षांपूर्वी तु्म्ही कसे ध्रुवीकरण करायचा, ते आता बदलले आहे. पण, त्याचा प्रभाव जवळजवळ समान आहे. आम्ही निवडणुकीच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. या आधारावर आपण असे म्हणू शकतो की, ज्या निवडणुकीत सर्वाधिक ध्रुवीकरण होते, असे म्हटले जाते, त्यातही कोणत्याही पक्षाला कोणत्याही एका समाजाच्या 50-55 टक्के मतदारांची जमवाजमव करता येत नाही. ध्रुवीकरणाला निवडणूक हरण्याचे कारण सांगणारे चुकीचे आहेत, असा त्यांचा अर्थ आहे," असेही ते पुढे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "समजा तुम्ही हिंदू समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलात. हा समाज देशात बहुसंख्य आहे. जर हिंदू समाजातील ध्रुवीकरणाची पातळी 50 टक्क्यांवर पोहोचली, म्हणजे त्यातील 50 टक्के लोक एकाच पक्षाला मत देतात कारण ते त्या पक्षाच्या प्रभावाखाली असतात. पण इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, ध्रुवीकरणाने प्रभावित झालेल्या प्रत्येक हिंदूसोबत दुसरा हिंदू आहे ज्याला त्याचा फटका बसत नाही. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण निर्णायक आहे असे मानणे. यामुळे निवडणूक जिंकता येते किंवा हरता येते…असे मानणे चुकीचे आहे."

किशोर पुढे म्हणाले की, "जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांना असे अनेक लोक भेटतात जे म्हणतात की सर्व हिंदूंचे ध्रुवीकरण झाले आहे. पण वस्तुस्थिती काही औरच सांगते. भारतात भाजपला 38 टक्के मते मिळाली आहेत. एक मिनिट कल्पना करा आणि सांगा की हे सर्व मतदार हिंदुत्वाच्या प्रभावाने भाजपला मतदान करतात का? भाजपला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या देशातील एकूण हिंदूंच्या निम्म्याहून कमी आहे." नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, "या राज्यात भाजपला 40 टक्के मते मिळाली आहेत. तर राज्यात हिंदू लोकसंख्या 80-82 टक्के आहे. याचा अर्थ निम्म्याहून कमी हिंदूंनी भाजपला मतदान केले. येथे आपण असे म्हणू शकतो की ध्रुवीकरणाचा परिणाम होतो पण केवळ ध्रुवीकरणाच्या जोरावर एखादा पक्ष निवडणुका जिंकतो किंवा हरतो असे म्हणता येणार नाही."

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरElectionनिवडणूकHinduहिंदू