शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
3
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
4
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
5
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
6
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
7
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
8
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
9
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
10
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!
11
दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले 'हे' IPS अधिकारी; एका पोस्टरवरुन केला मोठ्या कटाचा खुलासा
12
दिल्ली स्फोटाची भीषणता! लाल किल्ल्यापासून ३०० मीटर दूर दुकानाच्या छतावर सापडला मानवी हात; मृतांचा आकडा १३ वर
13
पाकिस्तानची अफगाणिस्तान अन् भारताला पोकळ धमकी; एकाचवेळी युद्ध करण्याची क्षमता आहे किती?
14
SIP द्वारे कोट्यधीश व्हायचंय? '१०-७-१०' हा फॉर्म्युला येईल कामी; श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही
15
खळबळजनक! लेकाला PUBG चं व्यसन, कंटाळलेल्या आईने अखेर संपवलं जीवन, वडील म्हणतात...
16
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
17
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
18
सोशल मीडियावर रातोरात व्हायरल झाली गिरीजा ओक, पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाली...
19
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
20
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट

Prashant Kishor: "देशात 80-82 टक्के हिंदू, पण भाजपला फक्त 40 टक्के लोक मतदान करतात"- प्रशांत किशोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 11:08 IST

Prashant Kishor on Polarisation: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील ध्रुवीकरणाच्या राजकारणावर अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. कोणत्याही पक्षाच्या जय-पराजयाकडे संपूर्ण ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.

नवी दिल्ली: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी देशातील हिंदू आणि भाजपला मिळणाऱ्या मतदानावर मोठे वक्तव्य केले आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात बोलताना किशोर म्हणाले की, "देशात 80 ते 82 टक्के लोकसंख्या हिंदू आहेत, पण तरीही भाजपला फक्त 40 टक्के मते मिळतात. अशा परिस्थितीत भाजप ध्रुवीकरणाच्या जोरावर निवडणुका जिंकतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे," असे ते म्हणाले.

देशाच्या राजकारणात कथितरित्या वाढत्या ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "देशात ध्रुवीकरणाची बाब अतिशय अतिशयोक्त पद्धतीने मांडली जात आहे. आता ध्रुवीकरणाची पद्धत बदलली आहे. 15 वर्षांपूर्वी तु्म्ही कसे ध्रुवीकरण करायचा, ते आता बदलले आहे. पण, त्याचा प्रभाव जवळजवळ समान आहे. आम्ही निवडणुकीच्या आकडेवारीचा अभ्यास केला आहे. या आधारावर आपण असे म्हणू शकतो की, ज्या निवडणुकीत सर्वाधिक ध्रुवीकरण होते, असे म्हटले जाते, त्यातही कोणत्याही पक्षाला कोणत्याही एका समाजाच्या 50-55 टक्के मतदारांची जमवाजमव करता येत नाही. ध्रुवीकरणाला निवडणूक हरण्याचे कारण सांगणारे चुकीचे आहेत, असा त्यांचा अर्थ आहे," असेही ते पुढे म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "समजा तुम्ही हिंदू समाजाचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलात. हा समाज देशात बहुसंख्य आहे. जर हिंदू समाजातील ध्रुवीकरणाची पातळी 50 टक्क्यांवर पोहोचली, म्हणजे त्यातील 50 टक्के लोक एकाच पक्षाला मत देतात कारण ते त्या पक्षाच्या प्रभावाखाली असतात. पण इथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की, ध्रुवीकरणाने प्रभावित झालेल्या प्रत्येक हिंदूसोबत दुसरा हिंदू आहे ज्याला त्याचा फटका बसत नाही. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण निर्णायक आहे असे मानणे. यामुळे निवडणूक जिंकता येते किंवा हरता येते…असे मानणे चुकीचे आहे."

किशोर पुढे म्हणाले की, "जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा त्यांना असे अनेक लोक भेटतात जे म्हणतात की सर्व हिंदूंचे ध्रुवीकरण झाले आहे. पण वस्तुस्थिती काही औरच सांगते. भारतात भाजपला 38 टक्के मते मिळाली आहेत. एक मिनिट कल्पना करा आणि सांगा की हे सर्व मतदार हिंदुत्वाच्या प्रभावाने भाजपला मतदान करतात का? भाजपला मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या देशातील एकूण हिंदूंच्या निम्म्याहून कमी आहे." नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, "या राज्यात भाजपला 40 टक्के मते मिळाली आहेत. तर राज्यात हिंदू लोकसंख्या 80-82 टक्के आहे. याचा अर्थ निम्म्याहून कमी हिंदूंनी भाजपला मतदान केले. येथे आपण असे म्हणू शकतो की ध्रुवीकरणाचा परिणाम होतो पण केवळ ध्रुवीकरणाच्या जोरावर एखादा पक्ष निवडणुका जिंकतो किंवा हरतो असे म्हणता येणार नाही."

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरElectionनिवडणूकHinduहिंदू