शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:26 IST

ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या. 

बालासोर / नवी दिल्ली : भारताने मंगळवारी आपल्या लष्करी क्षमतेत तांत्रिकदृष्ट्या नवा अध्याय जोडला. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची सलग दुसरी चाचणी यशस्वी ठरली. ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या. 

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५०० किमीपर्यंत असून, १ हजार किमी पेलोड ते वाहून नेऊ शकते. पहिली चाचणी सोमवारी यशस्वी ठरल्यानंतर मंगळवारी सलग दुसरी चाचणी घेण्यात आली. भारतीय बनावटीचे हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) पारंपरिक युद्धक्षेत्रासाठी विकसित केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, लष्कर तसेच उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ची पेलोड अर्थात १ हजार किलोपर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मारक क्षमता १५० ते ५०० किमी असून, अचूक मारा हे त्याचे महत्त्व आहे. 

नो फर्स्ट यूज न्युक्लियर धोरण

या धोरणाअंतर्गत पारंपरिक पद्धतीने शत्रूवर हल्ले करण्यासाठी ‘प्रलय’ची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजेच आण्विक अस्त्राशिवायही शत्रूला ताकदीने प्रत्युत्तर देण्याची क्षमता यामुळे भारतीय हवाईदलास मिळेल.

 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग