शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

शत्रूसाठी हे क्षेपणास्त्र ठरेल ‘प्रलय’, सलग दुसरी चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 11:26 IST

ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या. 

बालासोर / नवी दिल्ली : भारताने मंगळवारी आपल्या लष्करी क्षमतेत तांत्रिकदृष्ट्या नवा अध्याय जोडला. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘प्रलय’ क्षेपणास्त्राची सलग दुसरी चाचणी यशस्वी ठरली. ओडिशा किनारपट्टीवर डॉ. एपीजी अब्दुल कलाम बेटावरून या दोन्ही चाचण्या घेण्यात आल्या. 

या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ५०० किमीपर्यंत असून, १ हजार किमी पेलोड ते वाहून नेऊ शकते. पहिली चाचणी सोमवारी यशस्वी ठरल्यानंतर मंगळवारी सलग दुसरी चाचणी घेण्यात आली. भारतीय बनावटीचे हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) पारंपरिक युद्धक्षेत्रासाठी विकसित केले आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओ, लष्कर तसेच उद्योग क्षेत्राचे अभिनंदन केले आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ची पेलोड अर्थात १ हजार किलोपर्यंतची स्फोटके वाहून नेण्याची क्षमता हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मारक क्षमता १५० ते ५०० किमी असून, अचूक मारा हे त्याचे महत्त्व आहे. 

नो फर्स्ट यूज न्युक्लियर धोरण

या धोरणाअंतर्गत पारंपरिक पद्धतीने शत्रूवर हल्ले करण्यासाठी ‘प्रलय’ची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजेच आण्विक अस्त्राशिवायही शत्रूला ताकदीने प्रत्युत्तर देण्याची क्षमता यामुळे भारतीय हवाईदलास मिळेल.

 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभाग