शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 10:39 IST

Pulwama Attack BJP And Congress : पाकिस्तानने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नवी दिल्ली - भारतातील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानचेच कारस्थान होते, हे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीच खुद्द पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा केला. पाकिस्तानने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसवर टीका करत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे सुरक्षा दलांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. काँग्रेस व इतर पक्षांनी हा हल्ला म्हणजे ‘राजकीय कट-कारस्थान’ असल्याचा आरोप केला होता. मात्र आता पाकिस्तानी मंत्र्यानेच हल्ल्याची कबुली दिली असल्याने काँग्रेसने भाजपावर केलेला आरोप खोटा ठरला आहे. त्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे असं ट्वीट केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताला चोख प्रत्युत्तर दिल्याचेही पाकिस्तानने सांगितले. पाकिस्तानी हवाई दलाने भारतात घुसून भारतीय जवानांना मारल्याचा दावाही त्यांनी केला. पाकमधील विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री फवाद चौधरी म्हणाले, आम्ही भारताला त्यांच्या हद्दीत घुसून मारलं आहे आणि पुलवामात जे यश मिळालं ते इम्रान खान सरकारचंच मोठं यश आहे. रात्री उशिरा चौधरी यांनी आपण असे म्हणालोच नसल्याचे सांगत यू टर्न घेतला.

पाकिस्तानचे मंत्री दहशतवादाचे समर्थक असल्याचे झाले उघड 

पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी  पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे मोठे यश होते, असे वक्तव्य करत इम्रान यांच्या अडचणींत भर घातली आहे. पाकिस्तानचे  मंत्री उघडउघड दहशतवादाचे समर्थन करत असल्याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची टिप्पणी भारताने केली आहे. काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जमिनी घेण्याच्या केंद्राच्या नियमावर पाकिस्तानने केलेली टीका भारताने फेटाळून लावली आहे. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPrakash Javadekarप्रकाश जावडेकरBJPभाजपाIndiaभारतcongressकाँग्रेसPakistanपाकिस्तान