शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

सत्तेचे वारे..भाग एक

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळ

जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण निवडणुका झाल्यानंतरही कायतू व मिकी यांच्यातील वितुष्ट कायम राहिल. उलट दरी आणखी रुंदावेल व त्या पक्षात फुट पडू शकते, अशी स्थिती आहे. गोव्याच्या राजकारणात केवळ दोन आमदार देखील एका पक्षात चांगल्या प्रकारे राहू शकत नाही असा अनुभव अनेकदा आला आहे. दोन आमदारही एकत्र राहत नाही कारण राजकीय पक्षांसमोर ध्येयधोरण असे काही असत नाही. एखाद्या तत्त्वज्ञानाने आमदारांना बांधून ठेवले आहे असे चित्र कधी दिसत नाही. 2007 च्या निवडणुकीवेळी चर्चिल आलेमाव यांनी सेव्ह गोवा पक्ष स्थापन केला होता, तेव्हा त्या पक्षाच्या तिकीटावर चर्चिल हे नावेलीतून तर आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे कुडतरी मतदारसंघातून निवडून आले. नंतर काही महिन्यांनी रेजिनाल्ड व चर्चिल हे एकमेकांचे शत्रू बनले. तत्पूर्वीच्या काळात म्हणजे 2003-04 साली सुदिन ढवळीकर व पांडुरंग मडकईकर हे दोघे म.गो. पक्षाचे आमदार होते पण मडकईकर यांनी मंत्री ढवळीकर यांना त्यावेळी रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच काळात बाबूश मोन्सेरात, मिकी पाशेको व स्वर्गीय माथानी साल्ढाणा हे युगोडेपाचे आमदार होते. त्यावेळी बाबूशने युगोडेपास रामराम ठोकत भाजपचे घर गाठले होते. डॉ. विली डिसोझा हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री होते तेव्हा मिकी पाशेको हे राष्ट्रवादीचे आमदार होते. त्यावेळीही डिसोझा व पाशेको यांच्यात खूप वाद रंगायचे. जिथे दोन-तीन आमदारही जास्त काळ एकत्र राहू शकत नाही तिथे मोठय़ा पक्षांबाबत व आठ-दहा आमदारांच्या गटाबाबत काय
बोलावे?
पाशेको यांना जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी भाजपने आपल्यासोबत ठेवले. कारण ते सध्याही भाजपसोबत सत्तेत आहेत म्हणून नव्हे. जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी सासष्टीत काँग्रेसच्या आमदारांचे किती उमेदवार निवडून येतात व गोवा विकास पक्षाचे किती उमेदवार बाजी मारतात ते भाजपला पहायचे आहे. पाशेको यांची म्हणजेच त्यांच्या गोवा विकास पक्षाची शक्ती जर वाढली तर ते भाजपसाठी उपयुक्त ठरेल. कारण काँग्रेसची तेवढी जास्त हानी होईल. भाजपला सासष्टीत मते मिळत नाहीत. सासष्टी हा आपला बालेकिल्ला आहे असे काँग्रेस पक्ष मानतो. 2012च्या निवडणुकीवेळी त्यास पहिल्यांदा भाजपने सुरूंग लावला.