शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

Power Crisis In India: या 4 कारणांमुळे भारतावर ओढावलंय कोळशाचं संकट, जाणून घ्या सरकार काय करत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 10:55 IST

India Power Crisis: सरकारने एक कोअर मॅनेजमेंट कमिटी स्थापन केली असून, ही कमिटी कोळशाच्या साठ्यांवर देखरेख आणि व्यवस्थापन पाहते.

नवी दिल्ली: देशभरात कोळशाच्या पुरवठ्याअभावी 'ब्लॅक आऊट'चा धोका निर्माण झाला आहे. वीज प्रकल्पांना आवश्यकतेनुसार कोळसा मिळत नसल्याने वीज उत्पादनावर मोठा परिणाम पडू शकतो. या कोळशाच्या संकटामुळे अनेक राज्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने पुरवठा लवकरच सुधारेल असे म्हटले आहे. 

उर्जा मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोळशाच्या पुरवठ्यातील कमतरतेमागे अनेक कारणे आहेत. सरकारच्या म्हणण्यानुसार, आयात केलेल्या कोळशाच्या किमती वाढल्याने पुरवठा कमी झाला आहे. देशातील कोळशाच्या कमतरेमागे सरकारने चार कारणे सांगितले आहेत. 

1. अर्थव्यवस्था सुधारल्याने विजेची मागणी वाढली आहे.

2. सप्टेंबरमध्ये कोळशाच्या खाणींच्या आसपास अतिवृष्टीमुळे कोळशाच्या उत्पादनावर परिणाम झाला.

3. परदेशातून येणाऱ्या कोळशाच्या किमती वाढल्या.

4. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोळशाची साठवन केली नाही.

विजेचा वापर वाढला

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर अर्थव्यवस्था हळु-हळू सुधारू लागली. यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सध्या, दररोज 4 अब्ज युनिट्सचा वापर केला जात असून, यातील 65% ते 70% वीज कोळशापासून बनवली जाते. 2019च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये विजेचा वापर 106.6 अब्ज युनिट होता, तर या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 124.2 युनिटचा वापर झाला आहे. या काळात कोळशापासून विजेचे उत्पादन 2019 मध्ये 61.91% वरुन 66.35% पर्यंत वाढले. ऑगस्ट-सप्टेंबर 2019 च्या तुलनेत या वर्षाच्या त्याच दोन महिन्यात कोळशाचा वापर 18% वाढला.

मार्च 2021 मध्ये इंडोनेशियन कोळशाची किंमत $ 60 प्रति टन होती, जी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये वाढून $ 160 प्रति टन झाली. यामुळे कोळशाची आयात कमी झाली आहे. आयातित कोळशापासून वीजनिर्मिती 2019 च्या तुलनेत 43.6% कमी झाली आहे, ज्यामुळे एप्रिल ते सप्टेंबर 2021 दरम्यान देशांतर्गत कोळशावर 17.4 मे.टन अतिरिक्त मागणी वाढली आहे.

सरकार काय करत आहे?कोळशाच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी 27 ऑगस्ट रोजी ऊर्जा मंत्रालयाने कोअर मॅनेजमेंट टीमची स्थापना केली आहे. ही टीम आठवड्यातून दोनदा कोळशाच्या साठ्याचे निरीक्षण आणि व्यवस्थापन पाहते. या समितीमध्ये ऊर्जा मंत्रालयाचे अधिकारी, सीईओ, पोसोको, रेल्वे आणि कोल इंडिया लिमिटेड यांचा समावेश आहे. या समितीची 9 ऑक्टोबर रोजी बैठक झाली. त्यात नमूद केले आहे की, 7 ऑक्टोबर रोजी कोल इंडियाने एका दिवसात 1.501 मेट्रिक टन कोळसा पाठवला, ज्यामुळे वापर आणि पुरवठा यातील अंतर कमी झाले. येत्या तीन दिवसांत 1.6 मेट्रिक टनावर नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीजCoal Allocation Scamकोळसा खाण घोटाळाCoal Shortageकोळसा संकट