शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

उत्पन्न नव्हे, राहणीमानावरून ठरणार यापुढे दारिद्र्यरेषा! केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 06:55 IST

जागतिक बँकेने भारताला ‘निम्न मध्यम-उत्पन्न’ देशांच्या श्रेणीत वर्गीकृत केले आहे. या श्रेणीतील देशांच्या नागरिकांची दररोजची सरासरी खर्च क्षमता फक्त ७५ रुपये आहे. भारताच्या सध्याच्या श्रेणीतील खर्च क्षमतेपेक्षा हे अधिक उत्पन्न आहे.

नवी दिल्ली : दारिद्र्य रेषा ठरविण्याचे निकष बदलण्याची प्रक्रिया केंद्र सरकारकडून सुरू असून भविष्यात दारिद्र्य रेषा ठरविताना व्यक्तीचे उत्पन्न नव्हे, तर राहणीमानाचा दर्जा गृहीत धरला जाणार आहे. नव्या निकषांत घर, शिक्षण, स्वच्छता यांचा समावेश असेल. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने जारी केलेल्या गरिबीविषयक कार्यदस्तात (वर्किंग पेपर) ही माहिती देण्यात आली आहे.

दस्तात म्हटले आहे की, जागतिक बँकेने भारताला ‘निम्न मध्यम-उत्पन्न’ देशांच्या श्रेणीत वर्गीकृत केले आहे. या श्रेणीतील देशांच्या नागरिकांची दररोजची सरासरी खर्च क्षमता फक्त ७५ रुपये आहे. भारताच्या सध्याच्या श्रेणीतील खर्च क्षमतेपेक्षा हे अधिक उत्पन्न आहे. भारताला आपल्या संक्रमणाच्या नव्या वास्तवात स्वत:ला समायोजित करून घ्यावे लागेल. ‘निम्न मध्यम-उत्पन’ गटात असे देश आहेत, जे अगदीच भुकेच्या काठावर उभे नाहीत. तथापि, त्यांचे उत्पन्न एवढेही जास्त नाही की, त्याआधारे ते वाढत्या अर्थव्यवस्थेचा लाभ उठवू शकतील.

सध्याची सीमा वादग्रस्त -ग्रामविकास विभागाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सीमा गौर आणि आर्थिक सल्लागार एन. श्रीनिवास राव यांनी लिहिलेल्या कार्यदस्तात म्हटले आहे की, सध्याची दारिद्र्य रेषेची सीमा वादग्रस्त ठरलेली आहे. तिच्यात अनेक दोष आहेत. तेंडुलकर समितीने निर्धारित केलेली दारिद्र्य रेषा खूपच खाली असल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

मात्र, वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी धोरणकारांना दारिद्र्य रेषा आवश्यकही आहे. रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गरिबी निर्मूलनासाठी जीडीपीची वृद्धी ८ टक्के असणे आवश्यक आहे. कार्यदस्तात म्हटले आहे की, गरिबीविरोधातील लढ्यात भारत वेगाने प्रगती करीत आहे. तथापि, सामाजिक-आर्थिक संकेतकांवर अजूनही भारतात मोठ्या प्रमाणात असमानता आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारRural Developmentग्रामीण विकास