शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

कंपनी कायद्यातील दंडात्मक तरतुदी रद्द होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 4:58 AM

केंद्राचा प्रस्ताव : ४0 कलमांतून तुरुंगवासाची शिक्षा काढणार

नवी दिल्ली : कंपनी कायद्यातील दोन तृतियांश गुन्ह्यांतील दंडात्मक तरतुदी रद्द करण्याची तयारी केंद्र सरकारने चालविली आहे. या कायद्यातील ६६ पैकी ४0 कलमांतील तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद काढून टाकली जाणार आहे.

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने या सुधारणांसाठी आग्रह धरला आहे. छोट्या कंपन्यांसाठी असलेली दंडाची तरतूदही कमी करण्याची मागणी मंत्रालयाने केली आहे. देशात नोंदणीकृत असलेल्या ११ लाख कंपन्यांपैकी दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या आणि ५0 लाखांपर्यंत मूळ भागभांडवल (पेड-अप कॅपिटल) असलेल्या आठ लाख कंपन्यांना प्रस्तावित बदलांचा लाभ होईल. तडजोड प्रक्रियेद्वारे कंपनी अथवा तिचे संचालक दंड भरून खटला टाळू शकतील.

कॉर्पोरेट व्यवहार सचिव इंजेटी श्रीनिवास यांच्या नेतृत्वाखालील कंपनी कायदा समितीमध्ये या उपाययोजनांवर चर्चा झाली आहे. नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी तुरुंगवासाऐवजी कठोर प्रतिबंधात्मक तरतुदी करण्यावर समिती विचार करीत आहे. उदा. एखाद्या कंपनीने नियम मोडल्यास कंपनीला निधीपासून दूर ठेवता येऊ शकेल. अथवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचे स्थलांतर रोखता येईल.या समितीवर कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक आणि विधिज्ञ शार्दूल श्रॉफ हे सदस्य आहेत. काही आठवड्यांतच समिती अहवालास अंतिम स्वरूप देईल. पुढील महिन्यात होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायद्यात बदल करणारे विधेयक आणण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.गंभीर गुन्ह्यांतच कैदसूत्रांनी सांगितले की, संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा सन्मान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून, त्यानुसार कंपनी कायद्यात योग्य बदल केले जात आहेत. तडजोडीला परवानगी नसलेल्या कलमांना आम्ही हात लावणार नाही. तुरुंगवासाची तरतूद मात्र केवळ गंभीर गुन्ह्यांतच असेल.