शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 06:43 IST

फिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे.

- वसंत भोसलेफिर एक बार, मोदी सरकार’ अशी घोषणा देत देशाची सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे भारतीय जनता पार्टी रचत आहे. त्यासाठी भाजपाच्या मदतीला दक्षिण भारतातून येणारे एकमेव राज्य म्हणजे कर्नाटक आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांतील पराभवाने अस्वस्थ झालेल्या भाजापने राज्यातील सत्तारूढ काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ‘आॅपरेशन कमळ ’ राबवून पाहिले. त्यात यश न आल्याने येत्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाचेच आॅपरेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक नऊ जागा जिंकून देणारे कर्नाटक हे देशातील एकमेव होते. भाजपाने अठ्ठावीसपैकी सतरा जागा जिंकून वर्चस्व ठेवले होते, तर कर्नाटकातील तिसरी राजकीय शक्ती म्हणून आपली निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जनता दलाने दोन जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये स्वत: माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा समावेश आहे.कर्नाटक राज्य विधानसभेची निवडणूक गेल्या वर्षी झाली. त्यात काँग्रेसला बहुमत मिळविता आले नाही. भाजपाला बहुमत मिळविण्यास हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या जागा कमी पडल्या. जनता दलाने अठ्ठावीस जागा जिंकून किंगमेकरची भूमिका बजावली. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने जनता दलालाच मुख्यमंत्रीपद बहाल केले. त्यामुळे राज्यात आज काँग्रेस-जनता दल आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आघाडीचे सरकार पाडण्यासाठी वारंवार ‘आॅपरेशन कमळ’ योजना राबविली; पण मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या कुशल राजकीय डावपेचांमुळे ते शक्य झाले नाही. भाजपाला बहुमत मिळविता आले नाही, तसेच ते शाबीतही करता आले नाही. परिणामी काँग्रेस-जनता दल आघाडीला अपयशी ठरविण्याचा खटाटोप चालू ठेवला आहे. मात्र,सध्या तरी काँग्रेस आघाडीचा वरचष्मा राहणार असे वातावरण दिसत आहे. त्याचा लाभ उठविण्यासाठी अंतर्गत हेवेदावे बाजूला ठेवले तर कर्नाटक जिंकणे काँग्रेस-जनता दल आघाडीला शक्य आहे.दक्षिण कर्नाटकातील जागावाटपाची डोकेदुखीकाँग्रेस - जनता दल आघाडीने लोकसभा निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका भाजपला बसेल. मात्र जनता दलाचा प्रभाव असणाºया दक्षिण कर्नाटकातील १५ जागांचे वाटप करणेही डोकेदुखी ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत जनता दल, भाजपा व काँग्रेस अशी तिरंगी लढत झाली होती. दक्षिण कर्नाटकातील आठच मतदारसंघांत जनता दलाची निर्णायक ताकद आहे आणि भाजपा येथेच कमकुवत आहे.उत्तर कर्नाटकातील लढती काँग्रेस व भाजपा यांच्यातच होतील. कोकण किनारपट्टीतही तिन्ही जागांमध्ये याच पक्षांत लढत आहे. काँग्रेस-जनता दल आघाडीने एकसंधपणे लढत दिली तर दक्षिण भारतातून भाजपाला आशादायी ठरू शकणाºया कर्नाटकात फटका बसू शकतो. काँग्रेसने जनता दलाशी दगाफटका केला तर मात्र भाजपाचे पुन्हा वर्चस्व निर्माण होऊ शकते. काठावरच्या बहुमताने आघाडी सरकार टिकविण्याची जनता दलाची प्राथमिकता असल्याने भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न राहील.येडियुरप्पांना नाही केंद्रात रसकर्नाटकात भाजपचे नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना केंद्र सरकारच्या राजकारणात रस नाही. त्यांना केंद्रीय मंत्रिपद बहाल केले असतानाही त्यांनी न स्वीकारता राज्यात राहणे पसंत केले होते. त्यामुळे कर्नाटकात ते ‘फिर एक बार, मोदी सरकार’ यासाठी कितपत ताकदीने उतरतील, याची शंका आहे.याउलट कर्नाटकातील सत्तांतर करण्यातच त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आॅपरेशन कमळ ’ यशस्वी केल्यास, काँग्रेस-जनता दल आघाडी अधिक एकरूप होऊन त्वेषाने निवडणुकीत उतरू शकेल. तसेच वातावरण सध्या असल्याने राज्यात भाजपापुढे मोठे आव्हान आहे. देशाच्या राजकारणात महत्त्वाची भागीदारी करण्यासाठी दोन्ही बाजंूनी राजकारण निर्णायक ठरणार आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा