शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्रदूषण : दिल्लीकरांवर मृत्यूची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 5:54 AM

दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली - दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. ज्यांना श्वासाचे आजार आहेत ते खूपच त्रासले आहेत.शहर धुक्यात वेढले गेले आहे. दिल्लीला जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर घोषित केले गेले आहे. येत्या काही दिवसांत प्रदूषणाचा स्तर आणखी वाढेल व लोकांचा त्रासही, असे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही मोदी सरकार व केजरीवाल सरकार प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसलेले नाही. त्यावर राजकारण मात्र जोरात सुरू आहे. केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी प्रदूषणाचे मुख्य केंद्र पंजाब असून तेथे पिकाचे खुंट जाळले जात असल्याने त्याचा धूर दिल्लीकडे सरकतो व तोच प्रदूषणाचे मुख्य कारण बनले आहे, असा दावा केला. पंजाब सरकारचा दावा आहे की, आम्ही पिकाचे खुंट जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणात ७२ टक्के घट केली आहे. केंद्र मदत देत नसल्याने प्रदूषण १०० टक्के थांबवणे शक्य नाही.९३ टक्के मुले घेतात विषारी हवादिल्ली, बनारस, आग्रा, लखनौ, कानपूर ही जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून जाहीर झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचा उल्लेख करून काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, १५ वर्षांखालील वयाची ९३ टक्के मुले जगात विषारी हवा घेत आहेत.त्यापैकी २५ टक्के मुले भारतात आहेत. भारतात दरवर्षी १० लाख लोक या प्रदूषणामुळे मरण पावतात. जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांतील १४ भारतातील आहेत.

टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्ली