शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:01 IST

वारंवार उघड पडूनही, ते निर्लज्जपणे खोटेपणा पसरवत आहे. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. यामुळेच ते असे करत आहेत.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका लेखाने देशातील राजकारण जबरदस्त तापले आहे. राहुल गांधी यांचा हा लेख एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे. या लेखात राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड-गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. 'निवडणुकीत गडबड-गोंधळ करून भाजपला फायदा झाला,' असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या लेखावर निशाणा साधत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांचा नवा लेख म्हणजे एकामागून एक निवडणूक हरल्याचे त्यांचे दुःख आणि निराशेमुळे, बनावट नरेटिव्ह सेट करण्याची ब्लूप्रिंट आहे.

एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये जेपी नड्डा म्हणाले, "राहुल गांधी यांचा नवा लेख, एकापाठोपाठ एक निवडणूक हारल्याचे त्यांचे दुःख आणि निराशेमुळे, बनावट नरेटिव्ह सेट करण्याची ब्लूप्रिंट आहे.'

नड्डा पुढे म्हणाले, 'ते' हे सर्व स्टेप बाय स्टेप करतात. स्टेप 1: त्यांच्या कृत्यामुळे काँग्रेसला प्रत्येक निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागते.स्टेप 2: आत्मपरीक्षण करण्याऐवजी, ते विचित्र कट कारस्तान रचत असतात आणि फसवणुकीचा आरोप करतात.स्टेप 3: सर्व तथ्ये आणि आकडेवारी कडे दुर्लक्ष करतात.स्टेप 4: कुठल्याही पुराव्याशिवाय संस्थांची बदनामी करतात.स्टेप 5: त्यांना तथ्यांपेक्षा अधिक बातमीत राहण्याची आशा असते.

वारंवार उघड पडूनही, ते निर्लज्जपणे खोटेपणा पसरवत आहे. बिहारमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे. यामुळेच ते असे करत आहेत. लोकशाहीला नाटकाची गरज नाही. तिला सत्याची आवश्यकता आहे," असेही नड्डा यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींच्या आक्षेपांवर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? -जोवर राहुल गांधी सत्य स्वीकारणार नाहीत, जोवर ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोवर त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. मला वाटते, स्वतःशीच खोटे बोलून, स्वत:ला दिलासा देण्याचे काम राहुल गांधी करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहि‍णींचा अपमान राहुल गांधी करत आहेत. त्यांनी जागे झाले पाहिजे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

दरम्यान, रोज खोटे बोलले की लोकांना ते खरे वाटते, असे राहुल गांधींना वाटत आहे. त्यामुळेच त्याच त्या गोष्टी राहुल गांधी सातत्याने बोलतात. हा आरोप यापूर्वी त्यांनी केला होता. निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकांत किती मतदार वाढले होते, या निवडणूकीत किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले. पण रोज खोटे बोलायचे ही सवय राहुल गांधी यांना लागली आहे. कारण ते स्वत:च्या मनाला समजावत आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या आक्षेपांवर प्रत्युत्तर दिले. 

टॅग्स :j. p. naddaजे. पी. नड्डाRahul Gandhiराहुल गांधीMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस