शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राजकीय पक्ष आरटीआयबाहेर, निवडणूक आयोगाचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 2:10 AM

जनतेसाठी आम्ही काम करतो असं म्हणत राजकारण करणारी राजकीय पक्ष मात्र सर्वसामान्यांच्या माहितीच्या कक्षेत बसत नाहीत. त्यांनाच या पक्षांची माहिती मागवता येणार नाही, कारण राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, असा खुलास निवडणूक आयोगाने केला आहे.

नवी दिल्ली - जनतेसाठी आम्ही काम करतो असं म्हणत राजकारण करणारी राजकीय पक्ष मात्र सर्वसामान्यांच्या माहितीच्या कक्षेत बसत नाहीत. त्यांनाच या पक्षांची माहिती मागवता येणार नाही, कारण राजकीय पक्ष माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, असा खुलास निवडणूक आयोगाने केला आहे.भाजप, काँग्रेससह सहा राष्ट्रीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या अख्यत्यारीत आणण्याचा आदेश केंद्रीय माहिती आयोगाने दिला होता. त्याच्या अगदी विरुद्ध मत निवडणुक आयोगाने व्यक्त केले आहे.भाजप, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप हे सहा राष्ट्रीय पक्षांना तसेच समाजवादी पक्षाला इलेक्ट्रोरल बाँडद्वारे किती देणग्या मिळाल्या याची माहिती पुण्याच्या विहार धुर्वे यांनी माहितीच्या अधिकारात निवडणुक आयोगाकडे मागवली होती. त्यावर निवडणुक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, राजकीय पक्ष माहिती अधिकाराच्या कक्षेत येत नाहीत. २०१७-१८ साली इलेक्ट्रोरल बाँडच्या रुपाने किती देणग्या मिळाले याची माहिती राजकीय पक्षांनी निवडणुक आयोगाला येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सादर करायची आहे.सहा राष्ट्रीय पक्षांना माहिती अधिकाराच्या अख्यत्यारीत आणण्याचा निकाल केंद्रीय माहिती आयोगाने २०१३ साली दिला होता. त्याला कोणीही उच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते मात्र माहिती अधिकाराच्या कायद्याखाली काही जणांनी राजकीय पक्षांकडे मागविलेली माहिती त्यांना मिळाली नाही. केंद्रीय माहिती आयोगाच्या आदेशाचे पालन न झाल्याबद्दल काही समाजकार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून त्या खटल्याचा निकाल लागायचा आहे.‘त्या' आदेशाला आव्हान मिळालेले नाहीया संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते व्यंकटेश नायक म्हणाले की, केंद्रीय माहिती आयोगाने सहा राष्ट्रीय पक्षांना माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याबाबत दिलेल्या आदेशाला कोणीही न्यायालयात आव्हान दिलेले नाही. त्यावर स्थगिती आलेली नाही. त्यामुळे हा आदेश राजकीय पक्षांनी पाळला नाही तर तो अस्तित्वात आहे हे मान्य करावे लागेल. प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांबद्दलचा सर्व तपशील माहिती अधिकाराचा वापर करून जाणून घेता येईल. त्यामुळे हे पक्ष माहितीचा अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही, असा पवित्रा निवडणूक आयोगाने घेऊ नये. 

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत