शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

भाजपाची सावध पावले, घाई न करण्याची सूचना; काँग्रेसचे १० आमदार वेगळा गट बनवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 20:59 IST

JDU ची नजर १७ लोकसभेच्या जागा आणि इंडिया आघाडीच्या समन्वयक पदावर होती

पटणा - बिहारच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. आरजेडी आणि जेडीयू युती तुटण्याच्या मार्गावर असताना नीतीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा आहे. एकीकडे या चर्चांना उधाण आलेले असताना दुसरीकडे काँग्रेसबाबत मोठे दावे केले जात आहेत. काँग्रेसचे अनेक आमदारही भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बिहारमधील काँग्रेस आमदारांवरही भाजपाची नजर आहे. या स्थितीमुळे राज्यात भाजपा मजबूत होईल असं राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. 

भाजपाच्या सूत्रांनुसार, काँग्रेसचे १० हून अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपाची नजर बिहारमधील काँग्रेस आमदारांवर आहे आणि दहा आमदार वेगळे होऊन स्वतःचा गट स्थापन करू शकतात. दुसरीकडे, भाजपा आपल्या अटींवर नीतीशकुमार यांच्याशी तडजोड करेल. भाजपा एनडीएच्या सर्व घटक पक्षांची काळजी घेईल. काँग्रेसचे १० आमदार वेगळे झाले तर लालू यादव यांची खेळी बिघडेल. सध्याच्या परिस्थितीत, नीतीश त्यांच्यापासून वेगळे झाले तर बहुमताच्या आकडा गाठण्यासाठी लालू प्रसाद यादवांना ८ आमदारांची गरज आहे. मांझी (४ आमदार), AIMIM (१ आमदार), सुमित सिंग (अपक्ष) यांचा समावेश करून ती ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात होते. पण काँग्रेसच्या एकूण १९ पैकी १० आमदारांनीही वेगळी चूल मांडली तर बहुमताचा १२२ आकडा त्यांच्यापासून दूर होईल. 

पशुपती पारस, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांना सन्मानजनक स्थान मिळेल. भाजपचाही डोळा लव-कुश मतांवर आहे. नीतीश आणि कुशवाह एकत्र राहिल्यास निवडणुकीत मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आघाडीला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी एक बातमी अशीही येत आहे की, भाजपा आमदारांनी नीतीश कुमारांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. नीतीश कुमार यांच्या स्वागतासाठी भाजपा आमदार राजू सिंह सज्ज झाले आहेत. त्यांनी नीतीश कुमार यांचे कौतुक केले आहे. भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाने नीतीश कुमारांना मुख्यमंत्री केले तर ते आम्ही स्वीकारू असे त्यांनी म्हटले आहे.

नीतीश कुमार काँग्रेसवर नाराज?

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या सूत्रांनुसार, नीतीश कुमार काँग्रेसवर नाराज आहेत. नीतीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजक पद न देणे हे अपमानास्पद कृत्य होते. जागावाटपाच्या चर्चेला विलंब, समन्वयकपदाचा निर्णय न झाल्याने नीतीश कुमार काँग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. JDU ची नजर १७ लोकसभेच्या जागा आणि इंडिया आघाडीच्या समन्वयक पदावर होती. त्याचवेळी भाजपाने शनिवारी दुपारी ४ वाजता पाटण्यात सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय नेतृत्वाने बिहार राज्य पदाधिकाऱ्यांना बिहार सरकार स्थापनेचा फॉर्म्युला प्रस्तावित करण्याची घाई करू नये असे सांगितले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाcongressकाँग्रेस