शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:26 IST

सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांशी सामना करण्याचे धोरण जवळजवळ ३० वर्षांनंतर बदलले आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि २००६ मधील आरएसएस मुख्यालयावरील हल्ल्यामागील सूत्रधार अबू सैफुल्लाह खालीद म्हणजेच रजाउल्लाह निजामानी खालीद याची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रविवारी हत्या झाली. याकडे मोदी सरकारच्या सक्रिय धोरणाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांशी सामना करण्याचे धोरण जवळजवळ ३० वर्षांनंतर बदलले आहे. १९८९ पासूनच्या सरकारांनी पाकिस्तानच्या भूमीवरून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याला तोंड देण्याची काळजी घेतली नाही. वाजपेयी सरकारने याबाबत सक्रिय दृष्टिकोन जाहीर केला. मात्र, यातून ठोस काहीही निष्पन्न झाले नाही. कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. अगदी यूपीए सरकारनेही त्यांच्या दहा वर्षांच्या काळात अशा कोणत्याही धोरणाचे पालन केले नाही. 

२०२० पासून पाकिस्तानमध्ये २० हत्या घडल्या आहेत आणि त्याच्याशी थेट भारतीय यंत्रणांचा संबंध आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील असंतुष्ट आणि अफगाणिस्तानातील लोक व स्थानिक गुन्हेगार यांना हाताशी धरून पाकिस्तानमध्ये हे  हत्याकांड घडविण्यात आले.

दहशतवाद्यांना पैसे दिले; गोळ्या घालून मारलेजम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणारा आणखी एक प्रमुख दहशतवादी मोहम्मद रियाझ अहमद याला सप्टेंबर २०२३ मध्ये पीओकेमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाकमध्ये सय्यद खालीद रझा नावाचा दहशतवादी मारला गेला होता. २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शाहीद लतीफलाही असेच संपविले. 

मोदींनी दिले होते संकेत२४ एप्रिल रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे विधान केले होते की, भारत प्रत्येक दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा करील, भले ते कुठेही असोत. यातून या सक्रिय दृष्टिकोनाचे संकेत मिळतात. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या भूमीत अशा हत्याकांडांमध्ये वाढ झाली. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान