शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:26 IST

सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांशी सामना करण्याचे धोरण जवळजवळ ३० वर्षांनंतर बदलले आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि २००६ मधील आरएसएस मुख्यालयावरील हल्ल्यामागील सूत्रधार अबू सैफुल्लाह खालीद म्हणजेच रजाउल्लाह निजामानी खालीद याची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रविवारी हत्या झाली. याकडे मोदी सरकारच्या सक्रिय धोरणाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांशी सामना करण्याचे धोरण जवळजवळ ३० वर्षांनंतर बदलले आहे. १९८९ पासूनच्या सरकारांनी पाकिस्तानच्या भूमीवरून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याला तोंड देण्याची काळजी घेतली नाही. वाजपेयी सरकारने याबाबत सक्रिय दृष्टिकोन जाहीर केला. मात्र, यातून ठोस काहीही निष्पन्न झाले नाही. कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. अगदी यूपीए सरकारनेही त्यांच्या दहा वर्षांच्या काळात अशा कोणत्याही धोरणाचे पालन केले नाही. 

२०२० पासून पाकिस्तानमध्ये २० हत्या घडल्या आहेत आणि त्याच्याशी थेट भारतीय यंत्रणांचा संबंध आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील असंतुष्ट आणि अफगाणिस्तानातील लोक व स्थानिक गुन्हेगार यांना हाताशी धरून पाकिस्तानमध्ये हे  हत्याकांड घडविण्यात आले.

दहशतवाद्यांना पैसे दिले; गोळ्या घालून मारलेजम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणारा आणखी एक प्रमुख दहशतवादी मोहम्मद रियाझ अहमद याला सप्टेंबर २०२३ मध्ये पीओकेमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाकमध्ये सय्यद खालीद रझा नावाचा दहशतवादी मारला गेला होता. २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शाहीद लतीफलाही असेच संपविले. 

मोदींनी दिले होते संकेत२४ एप्रिल रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे विधान केले होते की, भारत प्रत्येक दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा करील, भले ते कुठेही असोत. यातून या सक्रिय दृष्टिकोनाचे संकेत मिळतात. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या भूमीत अशा हत्याकांडांमध्ये वाढ झाली. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान