शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 08:26 IST

सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांशी सामना करण्याचे धोरण जवळजवळ ३० वर्षांनंतर बदलले आहे.

हरीश गुप्ता -

नवी दिल्ली : लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आणि २००६ मधील आरएसएस मुख्यालयावरील हल्ल्यामागील सूत्रधार अबू सैफुल्लाह खालीद म्हणजेच रजाउल्लाह निजामानी खालीद याची पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रविवारी हत्या झाली. याकडे मोदी सरकारच्या सक्रिय धोरणाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांमधील उच्चपदस्थ सूत्रांनुसार, पाकिस्तानच्या भूमीवरून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांशी सामना करण्याचे धोरण जवळजवळ ३० वर्षांनंतर बदलले आहे. १९८९ पासूनच्या सरकारांनी पाकिस्तानच्या भूमीवरून निर्माण होणाऱ्या दहशतवादाच्या धोक्याला तोंड देण्याची काळजी घेतली नाही. वाजपेयी सरकारने याबाबत सक्रिय दृष्टिकोन जाहीर केला. मात्र, यातून ठोस काहीही निष्पन्न झाले नाही. कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हते. अगदी यूपीए सरकारनेही त्यांच्या दहा वर्षांच्या काळात अशा कोणत्याही धोरणाचे पालन केले नाही. 

२०२० पासून पाकिस्तानमध्ये २० हत्या घडल्या आहेत आणि त्याच्याशी थेट भारतीय यंत्रणांचा संबंध आहे. बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील असंतुष्ट आणि अफगाणिस्तानातील लोक व स्थानिक गुन्हेगार यांना हाताशी धरून पाकिस्तानमध्ये हे  हत्याकांड घडविण्यात आले.

दहशतवाद्यांना पैसे दिले; गोळ्या घालून मारलेजम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणारा आणखी एक प्रमुख दहशतवादी मोहम्मद रियाझ अहमद याला सप्टेंबर २०२३ मध्ये पीओकेमध्ये गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये पाकमध्ये सय्यद खालीद रझा नावाचा दहशतवादी मारला गेला होता. २०१६ मध्ये भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या शाहीद लतीफलाही असेच संपविले. 

मोदींनी दिले होते संकेत२४ एप्रिल रोजी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे विधान केले होते की, भारत प्रत्येक दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा करील, भले ते कुठेही असोत. यातून या सक्रिय दृष्टिकोनाचे संकेत मिळतात. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या भूमीत अशा हत्याकांडांमध्ये वाढ झाली. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान