शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

काँग्रेसचे जुने दिवस परतू लागले? भाजपने कर्नाटकात शोधली पराभवाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 15:09 IST

काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेला हमीभाव, नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे कर्नाटकातील पराभव झाल्याचे भाजपने म्हटले आहे.

कर्नाटकात विधानससभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. यात काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला. यावर आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत भारतीय जनता पक्षाने आढावा बैठक घेतली. यामध्ये तीन प्रमुख कारणे नमूद करण्यात आली आहेत. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेला हमीभाव, मुस्लिमांची एकजूट आणि नेत्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे कर्नाटकातील पराभव झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. 

Karnataka Election: डीके आणि सिद्धरामैय्यांनी सोबत केला नाश्ता, मल्लिकार्जुन खर्गेंनी असा सोडवला कर्नाटकचा प्रश्न...

कर्नाटकच्या निवडणुकीची धुरा सांभाळणाऱ्या अनेक नेत्यांसोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या मुद्द्यावर बैठक घेतली आणि त्यातून हा निष्कर्ष काढण्यात आला. भाजपच्या एका नेत्याचे म्हणणे आहे की, कर्नाटकातील जवळपास प्रत्येक घरात 'काँग्रेस' हमीपत्र पोहोचवले. त्यातील बहुतांश आश्वासने महिलांसाठी होती. भाजपनेही जवळपास अशीच आश्वासने दिली होती, पण त्यात बराच विलंब झाल्याचेही ते म्हणतात.

भाजपच्या आढावा बैठकीत सर्वात मोठी बाब समोर आली ती म्हणजे पक्षातील नेत्यांमधील समन्वयाचा अभाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या व्यासपीठावर लिंगायत समाजातील तगडे नेते बीएस येडियुरप्पा यांना महत्त्व देत असतानाही राज्य पातळीवर अशा समन्वयाचा अभाव होता. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि बीएस येडियुरप्पा यांची जुळवाजुळव झाली नाही. भाजपने येडियुरप्पा यांना हटवून बोम्मई यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवले आहे.

कर्नाटकात एकूण ५६ मुस्लिम बहुल जागा आहेत. २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने यापैकी ४२ जागा जिंकल्या. येथे हिंदूंचे ध्रुवीकरण झाले. या निवडणुकीत परिस्थिती उलटी झाली. मुस्लिमांनी एकदिलाने मतदान केल्याचे भाजप गृहीत धरत आहे. या ५६ पैकी ५५ जागा काँग्रेसला मिळाल्या. भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. मुस्लिम मतांवर नजर टाकली तर काँग्रेसला ७८ टक्के, जेडीएसला १२ टक्के आणि भाजपला ५ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसने १५ मुस्लिम उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ९ आमदार होण्यात यशस्वी ठरले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाKarnatakकर्नाटकcongressकाँग्रेस