शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

विशाखापट्टणममधील गॅसगळतीसाठी हा विषारी वायू ठरला कारणीभूत, कशासाठी होतो त्याचा वापर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 13:42 IST

विशाखापट्टणममध्ये झालेल्या या गॅस गळतीसाठी नेमका कुठला विषारी वायू कारणीभूत ठरला. या कंपनीमध्ये नेमके बनते काय? आणि तिथे या गॅसचा वापर कशासाठी होतो. असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत.

ठळक मुद्देविशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून जो विषारी वायू लिक झाला आहे त्याचं नाव स्टीरीन आहेया वायूला एथनीलबेन्झीन असेही म्हणतात. हे एक सिंथेटिक केमिकल आहे. हे केमिकल रंगहीन द्रव्याच्या रूपात असतेस्टीरीन हा अत्यंत ज्वालाग्राही असतो. त्यामुळे त्याचे ज्वलन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते.

विशाखापट्टणम - एकीकडे देश कोरोना विषाणूच्या संकटात सापडला असतानाच आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे. दरम्यान, विशाखापट्टणममध्ये झालेल्या या गॅस गळतीसाठी नेमका कुठला विषारी वायू कारणीभूत ठरला. या कंपनीमध्ये नेमके बनते काय? आणि तिथे या गॅसचा वापर कशासाठी होतो. असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. या प्रश्नांची उत्तरं खालील प्रमाणे आहेत.   विशाखापट्टणममधील विशाखा एलजी पॉलिमर कंपनीतून जो विषारी वायू लिक झाला आहे त्याचं नाव स्टीरीन आहे. या वायूला एथनीलबेन्झीन असेही म्हणतात. हे एक सिंथेटिक केमिकल आहे. हे केमिकल रंगहीन द्रव्याच्या रूपात असते. मात्र बराच वेळ हा गॅस ठेवला तर तो हलक्या पिवळ्या रंगाचा दिसतो.  

स्टीरीन हा अत्यंत ज्वालाग्राही असतो. त्यामुळे त्याचे ज्वलन होते तेव्हा मोठ्या प्रमाणात विषारी वायूचे उत्सर्जन होते. होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे माजी संचालक डॉक्टर डी. रघुनाथ राव यांनी सांगितले की, स्टीरीन गॅसचा वापर मुख्यत्वेकरून पॉलिस्टिरीन प्लॅस्टिक बनवण्यासाठी केला जातो.  

महत्वाच्या बातम्या...

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण

OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली

CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ

CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले

विशाखापट्टणममधील या फार्मा कंपनीत झालेल्या या गॅसगळतीमुळे आतापर्यंत ८ ते १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या गॅस गळतीमुळे सुमारे एक हजार लोक बाधित झाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात या वायू गळतीचा प्रभाव दिसून आला आहे. स्थानिक प्रशासन आणि नौदलाच्या जवानांनी कंपनीच्या आसपासच्या गावातून स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेशIndiaभारत