शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 08:21 IST

गेली १० वर्ष देशात भाजपाच्या नेतृत्वात केंद्रात सरकार आहे. मागील २ कार्यकाळात राम मंदिर उभारणी, कलम ३७० हटवणे यासारखे निर्णय घेण्यात आले.  

नवी दिल्ली - केंद्रातील एनडीए सरकार त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात 'वन नेशन, वन इलेक्शन' विधेयक आणणार आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा एकत्रित करण्याच्या हेतूने वन नेशन, वन इलेक्शन नाव देण्यात आलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)त समाविष्ट सर्व राजकीय पक्ष आणि सत्तेतील घटक पक्ष या विधेयकाचे समर्थन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवस पूर्ण होण्याआधी हा रिपोर्ट समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला घोषित झाले. त्यानंतर ५ दिवसांनी ९ जूनला नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. एक देश, एक निवडणूक ही भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील एक आश्वासन आहे. स्वातंत्रदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणातही मोदींनी वन नेशन, वन इलेक्शन यावर भाष्य करत सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचं आवाहन केले होते.

निवडणूक ३ किंवा ४ महिन्यात व्हायला हवी - पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, एक देश, एक निवडणूक हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं जी काळाची गरज आहे. सरकारच्या ५ वर्षाच्या कारकिर्दीत निवडणुका व्हायला नकोत. निवडणूक ३ किंवा ४ महिन्यात व्हायला हव्यात. संपूर्ण ५ वर्ष राजकारण नको. त्यातून निवडणुकीसाठी लागणारा खर्चही मोठ्या प्रमाणात बचत होईल असं त्यांनी सांगितले.

तसेच आम्ही एक देश, एक निवडणूक यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित केली. त्या समितीने रिपोर्ट सरकारला सोपवला आहे. आम्ही त्याचा अभ्यास करत आहोत. एक देश, एक निवडणूक यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ही केवळ राजकीय घोषणा नाही. हे देशासाठी महत्त्वाचे आहे असंही मोदींनी म्हटलं होतं.

रामनाथ कोविंद यांनी सोपवला रिपोर्ट

दरम्यान, वन नेशन, वन इलेक्शन यावर अभ्यास करण्यासाठी बनवण्यात आलेली माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने त्यांचा रिपोर्ट केंद्र सरकारला सोपवला. या रिपोर्टमध्ये काही शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि राज्यातील विधानसभा एकत्रित करायला हव्यात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर त्याच्या पुढील १०० दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. त्यामुळे देशात एका ठराविक काळात सर्व निवडणुका पार पाडल्या जातील असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनNarendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदBJPभाजपा