शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

जलसंवर्धनासाठी मोदींची अनोखी शक्कल; देशातील सरपंचाना पाठवले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 11:13 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील ६३७ हून अधिक गावातील सरपंचांना मोदींचे पत्र मिळाले आहे. खुद्द मोदींचे पत्र येणे हा ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे.

नवी दिल्ली - पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील कामाला सुरुवात केली आहे. यावेळी मोदी सरकार जलसंवर्धनावर भर देताना दिसून येत आहे. त्यासाठी मोदींनी एक अनोखी शक्कल लढवली असून त्यांनी देशातील सर्व गावांच्या सरपंचांना पत्र पाठविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील ग्रामपंचायतीचे सरंपच आणि प्रमुखांना वैयक्तीकरित्या पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये मोदींनी यंदाच्या मान्सूनच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणारे जलसंकट टळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वाक्षरी असलेले हे पत्र जिल्ह्याचे कलेक्टर सरपंचांना किंवा त्या गावच्या प्रमुखांना देणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघातील ६३७ हून अधिक गावातील सरपंचांना मोदींचे पत्र मिळाले आहे. खुद्द मोदींचे पत्र येणे हा ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रात जास्तीत जास्त लोकांना पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना मोदींनी सरपंचांना केल्या आहेत.

मोदींनी पत्रात म्हटले की, प्रिय सरपंचजी नमस्कार. आता मान्सूनचे लवकरच आगमण होणार आहे. आपण नशीबवान आहोत की, देव आपल्याला पावसाच्या रुपाने मोठ्या प्रमाणात पाणी देतो. आपण सगळ्यांनी मिळून या पाण्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, गावातील लोकांशी जलसंवर्धनासंदर्भात चर्चा करावी. मला विश्वास आहे की, तुम्ही पाण्याचा प्रत्येक थेंब साठवून ठेवाल, असंही मोदींनी पत्रात नमूद केले आहे.