शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

Swachhata Hi Seva Movement : मोदी म्हणाले, चार वर्षात केली 60 वर्षांची सफाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 12:09 IST

गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करून दाखवले. चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करून दाखवले. चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 'स्वच्छता हीच सेवा' या अभियानात संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसह बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती रतन टाटा आणि अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. देशात 40 टक्के स्वच्छता होती. ती आता 90 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करुन दाखविले आहे. आतापर्यंत 450 जिल्ह्यांसह 20 केंद्र शासित प्रदेश हागणदरीमुक्त झाले आहेत. फक्त शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानातील सहकार्याबद्दल अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली, त्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. फक्त स्वच्छतेच्याच नाही तर सामाजिक अभियानांमध्ये अमिताभ बच्चन यांचे मोठे योगदान आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, टाटा ट्रस्टचे स्वच्छता अभियानासाठी 100 कोटी रुपयांचे योगदान असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले. 

देशातील सर्व नागरीक आणि स्वच्छता प्रेमींनी या अभियानात भाग घेतल्यानेच स्वच्छता अभियान यशस्वी झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, स्वच्छता अभियानामुळे आतापर्यंत 3 लाख लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्लीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनRatan Tataरतन टाटा