शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

Swachhata Hi Seva Movement : मोदी म्हणाले, चार वर्षात केली 60 वर्षांची सफाई...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 12:09 IST

गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करून दाखवले. चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करून दाखवले. चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 'स्वच्छता हीच सेवा' या अभियानात संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसह बॉलिवूडमधील अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती रतन टाटा आणि अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या अभियानाला देशातील प्रत्येक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. देशात 40 टक्के स्वच्छता होती. ती आता 90 टक्क्यापर्यंत पोहोचली आहे. गेल्या 60 -70 वर्षात जे झाले नाही, ते चार वर्षात स्वच्छता अभियानातून करुन दाखविले आहे. आतापर्यंत 450 जिल्ह्यांसह 20 केंद्र शासित प्रदेश हागणदरीमुक्त झाले आहेत. फक्त शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  

याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानातील सहकार्याबद्दल अमिताभ बच्चन आणि रतन टाटा यांचे आभार मानले. अमिताभ बच्चन यांनी स्वच्छतेसाठी जनजागृती केली, त्यासाठी त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आहेत. फक्त स्वच्छतेच्याच नाही तर सामाजिक अभियानांमध्ये अमिताभ बच्चन यांचे मोठे योगदान आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, टाटा ट्रस्टचे स्वच्छता अभियानासाठी 100 कोटी रुपयांचे योगदान असल्याचेही नरेंद्र मोदी म्हणाले. 

देशातील सर्व नागरीक आणि स्वच्छता प्रेमींनी या अभियानात भाग घेतल्यानेच स्वच्छता अभियान यशस्वी झाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, स्वच्छता अभियानामुळे आतापर्यंत 3 लाख लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNew Delhiनवी दिल्लीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनRatan Tataरतन टाटा