शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पाच राज्यांमधील पराभवावर मोदी पहिल्यांदाच बोलले; बघा काय म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 19:01 IST

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेसने भाजपाला हादरा दिला. तिन्ही राज्यांमधील सत्ता भाजपाला गमवावी लागली. या पराभवावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील पराभवासाठी १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सीही (सरकारविरोधी लाट) कारणीभूत असल्याचं सांगतानाच, आम्ही कुठे कमी पडलो यावर विचार करून पुढची आखणी करत असल्याचंही मोदींनी स्पष्ट केलं. या पराभवांमुळे पक्षाचं मनोधैर्य अजिबात खच्ची झालं नाही आणि २०१९ मध्ये जनता आम्हालाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी एएनआय वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी राजकारणासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्याची सुरुवात झाली ती पाच राज्यांच्या निवडणूक निकालांपासून. मोदींच्या उत्तरांमधील ठळक मुद्दे....

>> तेलंगणा आणि मिझोरममध्ये भाजपा सत्तेवर येईल असा विचार मीही केला नव्हता आणि भाजपाच्या अन्य नेत्यांनाही तसं वाटत नव्हतं. 

>> छत्तीसगडमध्ये आमचा पराभव झाला, पण मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही. 

>> १५ वर्षांची अँटी इन्कम्बन्सी घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो. त्याचा फटका छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये बसला. त्याशिवाय आम्ही कुठे कमी पडलो यावर चर्चा सुरू आहे, आखणी सुरू आहे.  

>> पण त्याचवेळी, हरियाणात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही जिंकल्या. त्रिपुरामध्ये ९०-९५ टक्के यश मिळवलं. जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमध्येही लक्षणीय यश मिळालं. 

>> जिंकणं आणि हरणं हा एकच मानदंड नाही. 

>> मोदी लाट ओसरली असं म्हणणाऱ्यांचं अभिनंदन. कारण, मोदी लाट कधीतरी होती हे ते स्वीकारताहेत. 

>> देशात मोदी लाट वगैरे नाही, मोदी जिंकू शकत नाहीत, काही करू शकत नाहीत, असं २०१३-१४ मध्ये काही ठरावीक लोक बोलत होते. ते कोण लोक आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ते आजही तीच भाषा बोलताहेत. ज्यांच्यासाठी ते काम करतात, त्यांच्यासाठी त्यांना हे असं चित्र उभं करावंच लागतं. 

>> लाट ही फक्त आणि फक्त जनतेच्या आशा-आकांक्षांची असते. आपल्या आशा-आकांक्षा कोण पूर्ण करेल हे जनता ठरवते आणि त्याचीच लाट उसळते. आज जनतेत उत्साह आणि विश्वास आहे आणि जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018