शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'युद्ध सुरू राहिले, तर गंभीर परिणाम...', मध्यपूर्वेतील परिस्थितीवर PM मोदी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:37 IST

'भारत सातत्याने सर्व देशांना शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे.'

PM Narendra Modi in Budget Session : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेनंतर आज(दि.24) राज्यसभेत इराण युद्ध आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. भारताने नेहमीच संवादाचा मार्ग सुचवला असून सर्व संबंधित देशांशी भारत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

युद्धाचे गंभीर परिणाम...

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, कोणतेही युद्ध मानवतेच्या हिताचे नसते. या संघर्षाचे समाधान संवादातूनच होऊ शकते. भारत सातत्याने सर्व देशांना शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. जर हा संघर्ष दीर्घकाळ चालला तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. त्यामुळे भारत परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

आत्मनिर्भरतेवर सरकारचा भर

पंतप्रधानांनी सांगितले की, भारत कोणत्याही क्षेत्रात इतर देशांवर जास्त अवलंबून राहू नये यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शिपबिल्डिंगपासून रेअर अर्थ मिनरल्सपर्यंत अनेक क्षेत्रांत आत्मनिर्भरतेसाठी पावले उचलली आहेत. या युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून परिस्थितीतून सावरण्यासाठी वेळ लागेल, असेही त्यांनी सांगितले.

संकट ही देशाच्या धैर्याची परीक्षा

मोदी म्हणाले की, कोणतेही संकट हे देशाच्या धैर्य आणि प्रयत्नांची परीक्षा घेत असते. मागील 11 वर्षांत भारताने अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आवश्यक वस्तूंचा पुरवठा भारतात सुरळीत राहावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चरवरील हल्ल्यांचा भारताचा निषेध

पश्चिम आशियातील युद्धाला तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ झाला आहे. यामुळे जगात ऊर्जा संकट निर्माण झाले आणि त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. भारताने नागरिक, नागरी पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्थेवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे. तसेच तणाव कमी करण्यासाठी आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : War continues, serious consequences: PM Modi speaks on Middle East.

Web Summary : PM Modi addressed Rajya Sabha on the Iran war, emphasizing dialogue. Continued conflict will have global impact. India is focused on self-reliance and ensuring smooth supply of essential goods. India condemns attacks on civilian infrastructure and seeks de-escalation.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई