शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 7:19 AM

'बालाकोटमधले 300 फोन दिसतात, पण पुलवामातील 50 किलो आरडीएक्स दिसत नाही'

हैदराबाद: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पुलवामा हल्ल्यावेळी बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का, असा सवाल त्यांनी मोदींना विचारला. पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन ओवेसी मोदी सरकारवर बरसले. त्यावेळी त्यांनी सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवत सरकारवर तोफ डागली. त्यांनी हैदराबादमध्ये एका बैठकीला संबोधित केलं. 'भारतीय हवाई दलानं बालाकोटवर बॉम्ब टाकले. त्यात 250 दहशतवादी मारले गेले, असं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार एनटीआरपीनं त्या भागात 300 मोबाईल फोन सक्रीय असल्याची माहिती दिली होती. तुम्हाला बालाकोटमध्ये सक्रीय असलेले 300 फोन दिसतात. पण पुलवामात तुमच्या नाकाखालून आणण्यात आलेलं 50 किलो आरडीएक्स दिसत नाही,' अशा शब्दांमध्ये ओवेसी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. पुलवामा हल्ला झाला त्यावेळी मोदी आणि राजनाथ सिंह काय करत होते? बीफ बिर्यानी खाऊन झोपले होते का?, असे सवाल करत ओवेसींनी टीकेची झोड उठवली. माझी लढाई सांप्रदायिक शक्तींविरोधात आहे. देशातील धर्मनिरपेक्षता आणि बंधुभाव संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात माझा संघर्ष आहे, असं ओवेसी म्हणाले. काँग्रेस आणि भाजपामध्ये अजिबात फरक नाही, असं म्हणत त्यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं. असदुद्दीन ओवेसी हैदराबादमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे. सलग चौथ्यांदा ते हैदराबादमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असतील. हा मतदारसंघ एमआयएमचा बालेकिल्ला मानला जातो. तीन दशकांहून अधिक कालावधीपासून हा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात आहे. असदुद्दीन ओवेसी यांचे वडील सलाहुद्दीन ओवेसी यांनी सलग सहावेळा (1984 ते 2004) या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर ओवेसी सलग तीनवेळा इथून निवडून आले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दल