शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

...तर पाकिस्तानचं एकही विमान वाचलं नसतं- पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 16:30 IST

मोदींची पाकिस्तानसह विरोधकांवर जोरदार टीका

जामनगर: एअर स्ट्राइकवरुन प्रश्न विचारणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार पलटवार केला. दहशतवाद संपावा ही देशवासीयांची इच्छा आहे. त्यासाठी सैन्याची कारवाई सुरू आहे. मात्र काही लोकांना सैन्याच्या कारवाईवर विश्वास नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राफेलच्या मुद्द्यावरुन काँग्रेसला लक्ष्य केलं. हवाई हल्ल्याच्यावेळी आपल्याकडे राफेल विमान असतं, तर आपलं एकही विमान कोसळलं नसतं आणि त्यांचं एकही विमान वाचलं नसतं, असं म्हणत मोदींनी राफेल करारासाठी काँग्रेसनं प्रचंड वेळ घालवल्याची टीका केली. मोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.मोदींनी जामनगरमधील त्यांच्या सभेत पाकिस्तान आणि विरोधी पक्षांवर तोंडसुख घेतलं. 'भारताला उद्ध्वस्त करण्याचा मानस बाळगणाऱ्यांना हा देश सोडणार नाही,' अशा शब्दांमध्ये मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला. 'दहशतवाद हा आजार आहे आणि आम्ही त्या आजाराच्या मूळावर घाव घालत आहोत. शेजारचा देश दहशतवादाचं मूळ आहे. त्यामुळे आम्ही दहशतवादाचा मूळापासून निपटारा करत आहोत,' असं मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी विरोधकांवर तोफ डागली. विरोधकांचा सैन्यावर विश्वास नाही. मात्र आम्हाला सैन्याचा अभिमान वाटतो, असं त्यांनी म्हटलं. यावेळी पंतप्रधानांनी राफेल विमानाचा मुद्दादेखील उपस्थित केला. आज आपल्या हवाई दलाकडे राफेल असतं, तर आपलं एकही विमान जमीनदोस्त झालं नसतं आणि त्यांचं (पाकिस्तानचं) एकही विमान वाचलं नसतं, असं मोदी म्हणाले. आम्हाला दहशतवाद संपवायचा आहे. दहशतवाद संपवणं हेच आमचं ध्येय आहे. मात्र त्यांना केवळ मोदीला संपवायचं आहे, अशी टीका त्यांनी केली. मोदींनी कालही राफेलच्या मुद्यावरुन राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी ते राहुल यांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी