शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राम मंदिराला होणाऱ्या विलंबासाठी काँग्रेसच कारणीभूत, नरेंद्र मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 16:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला.

अलवर ( राजस्थान) - राम मंदिराच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सध्या अयोध्येतील आणि देशातील वातावरण तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील अलवर येथे झालेल्या सभेत राम मंदिराप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेत काँग्रेसकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप केला. तसेच काँग्रेस नेत्यांनीच सर्वोच्च न्यायालयामध्ये राम मंदिराची सुनावणी टाळण्याची अपील केली होती, असाही आरोप मोदींनी केला. अलवर येथील रॅलीमध्ये मोदी म्हणाले, अयोध्येचा खटला सुरू होता तेव्हा काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा सदस्य म्हणाले की, राम मंदिराचा खटला २०१९ पर्यंत चालवू नका, कारण २०१९ मध्ये निवडणुका आहेत. देशातील न्यायव्यवस्थेला अशा प्रकारच्या राजकारणामध्ये योग्य आहे का?" असा सवालही मोदींनी केला. 

'' सर्वोच्च न्यायालयाचे कुठलेही न्यायाधीश अयोध्येसारख्या गंभीर आणि संवेदनशील  प्रकरणी न्यायदान करण्याच्या दिशेने सर्वांचे मत ऐकूण घेण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा काँग्रेसचे राज्यसभेमधील एक खासदार आणि वकीलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोग आणून त्यांना घाबरवले होते. आता काँग्रेसवाल्यांनी न्यायमूर्तींना घाबरवण्याचे- धमकावण्याचे काम सुरू केले आहे," असा आरोपही मोदींनी केला. तसेच काँग्रेसकडे विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची हिंमत नाही. त्यामुळे त्यांनी मोदींच्या जातीचा मुद्दा समोर आणला आहे, असा आरोपही मोदींनी केली.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसAyodhyaअयोध्या