शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

भ्रष्टाचाराच्या कारवाईविरोधात विरोधकांची एकजूट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2018 19:19 IST

केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत.

कटक - केंद्रातील मोदी सरकारला आज चार वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भाजपा आणि मोदी सरकारमधील मंत्री, सरकारनं केलेली काम- राबवलेल्या योजना यांसहीत अन्य गोष्टींचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्यात व्यस्त आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही  ओडिशातील कटक येथे जनतेला संबोधित करताना त्यांनी आपल्या सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर केले. 

(राहुल गांधींनी मोदी सरकारला दिलं 'एफ' ग्रेड)

सरकारनं केलेल्या कामाचं कौतुक करत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही जनपथहून सरकार चालवत नाही. शिवाय काळा पैसा आणि भ्रष्टाचारविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहीमबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही JAM म्हणजे जनधन, आधार आणि मोबाइलच्या माध्यामातून 80,000 कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून वाचवले. 

मोदी पुढे असंही म्हणाले, देशात सध्या कन्फ्युजनवालं नव्हे तर कमिटमेंटवालं सरकार आहे. त्यामुळेच देशात ‘सर्जिकल स्ट्राईक्स’ सारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्याचबरोबर ‘वन रँक वन पेन्शन’ सारखा अनेक दशकांपासून अडकलेला निर्णय लागू होतो.

दरम्यान, यावेळी मोदींनी जनतेला भावनिक साद घालण्याचाही प्रयत्न केला. ''तुमच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्ने आणि आशाच मला काम करण्यासाठी प्रेरणा देत असतात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आमचे असे सरकार आहे ज्यांचा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान हे सर्वजण गरीबीतून पुढे आलेले आहेत. त्यामुळे मोदी सरकार हे गरीबांसाठीचे सरकार आहे. काँग्रेसला हे का कळले नाही की, यापूर्वी गरीबांना बँका दारातही उभ्या करीत नव्हत्या. गरीबांनाही काही मूल्ये आहेत, त्यांनाही जीवन विम्याची गरज असते हे काँग्रेसला आजवर का कळू शकले नाही? असा सवाल यावेळी मोदींनी विचारला.

शिवाय, आपला देश बदलू शकतो, असं गेल्या चार वर्षांत 125 कोटी भारतीयांना वाटते आहे. आज देश काळ्या पैशापासून ‘जनधन’कडे अर्थात वाईट सरकारकडून चांगल्या सरकारकडे वळला आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लोबाल चढवला. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस