शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संधी ओळखण्याची हीच खरी वेळ; मोदींनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 15:21 IST

मोदी म्हणाले, समस्यांवरील औषध बळकट होणे हे आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. कोरोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत.

ठळक मुद्देमोदी इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होतेआता प्रत्येक भारतीय नागरिक या संकटाचं संधीत रुपांतर करण्याच्या इच्छाशक्तीने काम करत आहे - मोदीआता लोकलपासून व्होकल आणि एक्सपोर्टर बनन्याची वेळ

नवी दिल्ली : संपूर्ण जग आज कोरोनाविरुद्ध लढत आहे. यात भारतही मागे नाही. मात्र, आता प्रत्येक भारतीय नागरिक या संकटाचं संधीत रुपांतर करण्याच्या इच्छाशक्तीने काम करत आहे. ज्या क्षेत्रात भारत मागे आहे. त्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची हीच संधी आहे, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर आज आपल्या मनात एक मोठा 'जर' निर्माण होत आहे, असेही मोदी म्हणाले. ते इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात बंगाली भाषेत केली. हा कार्यक्रम कोलकात्यात पार पडत आहे.

पंतप्रधानांनी सांगितले, भारतीयांच्या मनातील 'जर'...इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमत मोदी म्हणाले, आज प्रत्येक भारतीयाच्या मनात एक 'जर' आहे, जर आपण वैद्यकीय उपकरणे तयार करण्याच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो... जर आपण कोळसा आणि खनिजांच्या क्षेत्रांत स्वयंपूर्ण झालो... जर आपण खान्याच्या तेलाच्या उत्पादनात समोर आलो... जर खताच्या उत्पादनात भारत स्वावलंबी झाला... जर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करण्यात भारत स्वयंपूर्ण झाला... असे अनेक 'जर' आज भारतीयांच्या मनात आहेत. गेल्या 5-6 वर्षांत भारताच्या आत्मनिर्भरतेचे लक्ष्य सर्वप्रथम राहिले आहे. कोरोना संकटाने याची गती आणखी वाढवण्याचा धडा दिला आहे. यातूनच आत्मनिर्भर भारत अभियान पुढे आले आहे.

...अन् तेव्हापासून मुलं होणं बंद झालं, पोट धरून हसवणारी लालूप्रसादांची उत्तरं अन् किस्से

समस्यांवरील औषध बळकट होणे आहे -मोदी म्हणाले, समस्यांवरील औषध बळकट होणे हे आहे. कठीण काळाने नेहमीच भारताची इच्छाशक्ती वाढवली आहे. कोरोनानंतर आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या दिशेने आपल्याला पावले टाकायची आहेत. प्रत्येक भारतीयाच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल, की भारत या-या क्षेत्रांमद्ये आत्मनिर्भर बनू शकतो.

कोरोनाला नक्कीच पराभूत करू -पंतप्रधान मोदी म्हणाले, आपण संपूर्ण तागदीनिशी कोरोनाचा सामना करत आहोत. आपण त्यावर नक्कीच विजय मिळवू. आपले कोरोना योद्धे त्याचा सामना करत  आहेत. 

CoronaVirus News: उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल की वाढेल? संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती

आता लोकलपासून व्होकल आणि एक्सपोर्टर बनन्याची वेळ -'कुटुंबातही मुलगा अथवा मुलगी जेव्हा 18-20 वर्षांचे होतात, तेव्हा आई-वडील म्हणतात, की आपल्या पायावर उभे राहायला शिका. आपण आत्मनिर्भर होण्याचा पहिला धडा घरातूनच शिकतो. भारतालाही आपल्या पायावर उभे राहावे लागेल. भारताने परावलंबित्व कमी करावे. दुसऱ्या देशांवर कमितकमी अवलंबून राहावे. जी गोष्ट भारताला आयात करावी लागते, ती भारतातच कशी तयार होईल? आणि भविष्यात भारतच त्या गोष्टींचा एक्पोर्टर कसा बनेल? या दिशेने आपल्याला काम करावे लागेल. लोकलसाठी व्होकल होण्याची वेळ आहे. देशाला आणि प्रत्येक जिल्ह्याला आता आत्मनिर्भर बनवण्याची वेळ आहे,' असेही मोदी म्हणाले.

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीbusinessव्यवसायICCआयसीसीwest bengalपश्चिम बंगालprime ministerपंतप्रधानIndiaभारत