शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

'मोदींच्या भाषणात नवीन काहीही नव्हते; आम्ही प्रत्येक मिनिटाचा हिशेब मागणार', काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:11 IST

लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी देशाच्या नावे संदेश दिला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून(दि.24) 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. पण, अधिवेशनापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भाषणावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान मोदींकडे देण्यासारखे नवीन काहीच नाही. नेहेमीप्रमाणे ते दुसऱ्याच मुद्द्यावर लोकांचे लक्ष नेत आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. 

जयराम रमेश आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, "लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांचा वैयक्तिक, राजकीय आणि नैतिकदृष्ट्या दणदणीत पराभवाला झाला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आज संसदेबाहेरुन देशाला संदेश दिला, पण यात नवीन काहीही नव्हते. त्यांच्या बोलण्यातून त्यांना जनादेशचा अर्थ समजला नसल्याचे दिसून येते. त्यांचा वाराणसीत कमी फरकाने विजय झाला, त्यामुळे त्यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये. इंडिया आघाडी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाचा हिशेब मागणार आणि त्यांचा खरा चेहरा समोर आणणार," अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस अध्यक्षांची टीकादुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे पीएम मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील, अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील, अशी आशा होती. पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले. मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे, पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही. आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते, रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना, अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते," अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?अधिवेशनापूर्वी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. लोकांना विरोधकांकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. विरोधक आपली भूमिका बजावतील आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील, अशी आशा आहे." यावेळी त्यांनी 25 जून रोजी आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आणि याला भारताच्या लोकशाहीवरील 'काळा डाग' म्हटले.

देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक - पंतप्रधान मोदी

"जर आपल्या देशातील नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला असेल तर याचा अर्थ त्यांनी सरकारच्या धोरणांना आणि हेतूंना मान्यता दिली आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे," असे पंतप्रधानांनी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस