शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

'मोदींच्या भाषणात नवीन काहीही नव्हते; आम्ही प्रत्येक मिनिटाचा हिशेब मागणार', काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:11 IST

लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पीएम मोदींनी देशाच्या नावे संदेश दिला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून(दि.24) 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. पण, अधिवेशनापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या भाषणावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले. पंतप्रधान मोदींकडे देण्यासारखे नवीन काहीच नाही. नेहेमीप्रमाणे ते दुसऱ्याच मुद्द्यावर लोकांचे लक्ष नेत आहेत, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली. 

जयराम रमेश आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतात, "लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानांचा वैयक्तिक, राजकीय आणि नैतिकदृष्ट्या दणदणीत पराभवाला झाला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी आज संसदेबाहेरुन देशाला संदेश दिला, पण यात नवीन काहीही नव्हते. त्यांच्या बोलण्यातून त्यांना जनादेशचा अर्थ समजला नसल्याचे दिसून येते. त्यांचा वाराणसीत कमी फरकाने विजय झाला, त्यामुळे त्यांनी कोणत्याही भ्रमात राहू नये. इंडिया आघाडी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाचा हिशेब मागणार आणि त्यांचा खरा चेहरा समोर आणणार," अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेस अध्यक्षांची टीकादुसरीकडे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे पीएम मोदींवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील, अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील, अशी आशा होती. पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले. मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे, पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही. आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते, रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना, अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते," अशी टीका त्यांनी केली.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?अधिवेशनापूर्वी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारताला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. लोकांना विरोधकांकडून चांगल्या गोष्टींची अपेक्षा आहे, परंतु आतापर्यंत त्यांनी निराशाजनक कामगिरी केली आहे. विरोधक आपली भूमिका बजावतील आणि लोकशाहीची प्रतिष्ठा राखतील, अशी आशा आहे." यावेळी त्यांनी 25 जून रोजी आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण होत असल्याची आठवणही त्यांनी करून दिली आणि याला भारताच्या लोकशाहीवरील 'काळा डाग' म्हटले.

देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक - पंतप्रधान मोदी

"जर आपल्या देशातील नागरिकांनी सलग तिसऱ्यांदा सरकारवर विश्वास ठेवला असेल तर याचा अर्थ त्यांनी सरकारच्या धोरणांना आणि हेतूंना मान्यता दिली आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक आहे, पण देश चालवण्यासाठी एकमत आवश्यक आहे," असे पंतप्रधानांनी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस