शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

PM मोदींनी केले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत, म्हणाले- 'जम्मू-काश्मीरमधून कलम 370...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:40 IST

PM Modi on Article 370 SC Verdict: पीएम नरेंद्र मोदींनी #NayaJammuKashmir हॅशटॅगसह एक्सवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 (Jammu-Kashmir Article 370) हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सुनावला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही स्वागत केले. PM मोदींनी आज #NayaJammuKashmir हॅशटॅगसह ट्विट केले की, 'कलम 370 रद्द करण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक असून, या निर्णयामुळे संसदेने 5 ऑगस्ट 2019 रोजी घेतलेला निर्णय घटनात्मकदृष्ट्या कायम राहील.'

संबंधित बातमी -कलम ३७० हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्य आणि घटनात्मकदृष्ट्या वैध, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

पीएम मोदी पुढे लिहितात, 'आजचा निर्णय म्हणजे, जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील आपल्या लोकांसाठी नवी आशा, प्रगती आणि एकतेची घोषणा आहे. न्यायालयाने आपल्या प्रगल्भ ज्ञानाने एकतेचे मूलतत्त्व बळकट केले, जे एक भारतीय म्हणून आपण सर्वांपेक्षा प्रिय आणि मोठे आहे. मी जम्मू, काश्मीर आणि लडाखच्या लोकांना खात्री देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.' 

'प्रगतीचे फायदे केवळ तुमच्यापर्यंतच नाही, तर ज्यांना कलम 370 मुळे त्रास सहन करावा लागला, अशा समाजातील सर्वात असुरक्षित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचतील, याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर निर्णय नाही, हा आशेचा किरण आहे, उज्ज्वल भविष्याची प्रतिज्ञा आहे आणि एक मजबूत, अधिक अखंड भारत निर्माण करण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पाचा दाखला आहे,' अशी प्रतिक्रिया पीएम मोदींनी व्यक्त केली.

राज्यात शांतता परत आली - अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ते म्हणाले, 'कलम 370 रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 5 ऑगस्ट 2019 रोजी पीएम नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द करण्याचा दूरदर्शी निर्णय घेतला. तेव्हापासून जम्मू-काश्मीरमध्ये शांतता परत आली आहे. एकेकाळी हिंसाचाराने ग्रासलेल्या राज्यात प्रगती आणि विकासामुळे मानवी जीवनाला नवा अर्थ प्राप्त झालाय. पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील समृद्धीमुळे जम्मू, काश्मीर आणि लडाख या दोन्ही भागातील रहिवाशांच्या उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली आहे.'

टॅग्स :Article 370कलम 370Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीर