शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी-शहांची हवा ओसरली; आता फक्त 40% भागात भाजपाची सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 10:21 IST

दोन वर्षात अनेक महत्त्वाची राज्यं भाजपाच्या हातून गेली

मुंबई: नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर भाजपाचा देशभरात वेगानं विस्तार झाला. मोदी पंतप्रधान होताच अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आली. २०१७ च्या अखेरपर्यंत देशातील ७१ टक्के भागात भाजपाची सत्ता होती. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजपा अध्यक्ष अमित शहांचं संघटन, रणनीती कौशल्य यांच्यामुळे भाजपानं देशभरात घोडदौड केली. मात्र चौखूर उधळलेला भाजपाचा वारू रोखण्यात विरोधकांना यश आल्याचं दिसत आहे. डिसेंबर २०१७ पासून भाजपाची लाट ओसरायला सुरुवात झाली. डिसेंबर २०१७ मध्ये देशातील ७१ टक्के भागात भाजपाची सत्ता होती. मात्र आता केवळ ४० टक्के भागात भाजपाची सत्ता शिल्लक आहे. त्यामुळे मोदी आणि शहा यांचा करिश्मा कमी झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या जागा वाढल्या असल्या तरीही विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी खालावली. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड यांच्यासारखी महत्त्वाची राज्यं राखण्यात भाजपाला अपयश आलं. दोन वर्षात अनेक राज्य गमावणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रातही धक्का बसला. राज्यात मोठा सर्वात पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता सोडण्याची नामुष्की आली. देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. मात्र राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अजित पवारांच्या शपथविधी उपस्थित असलेल्या सर्व आमदारांना एकत्र आणत भाजपाचं सत्ता स्थापनेचं स्वप्न धुळीस मिळवलं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtraमहाराष्ट्र