शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 20:29 IST

Tata Group Air India Plane Crash: एअर इंडिया अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना टाटा समूहाने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. हे दुःख शब्दात व्यक्त करता न येण्यासारखे नाहीये, असे म्हणत टाटा सन्सचे चंद्रशेखरन यांनी मदतीसंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

Air India Plane Crash Tata Group: 'या क्षणाला जे दुःख झालं आहे, ते व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत. ज्यांनी या अपघातात प्राण गमावले आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या सहवेदना आणि प्रार्थना', अशा शब्दात टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी शोक व्यक्त केला. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलायनर हे विमान कोसळून प्रवासी आणि क्रू मेबर्स अशा २४० जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या ५ मिनिटामध्ये हे विमान कोसळले. 

मृतांच्या कुटुंबीयांना १ कोटी, जखमींचा खर्च करणार

या विमान अपघातानंतर टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एक शोक व्यक्त केला. 

चंद्रशेखरन म्हणाले, "आम्हाला एअर इंडियाच्या फ्लाइट १७१ च्या वाईट घटनेमुळे मनापासून दु:ख झाले आहे. या क्षणी आम्हाला झालेले दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, तसेच जे जखमी झाले आहेत, त्या सर्वांच्या आमच्या सहवेदना आणि प्रार्थना आहेत."

वाचा >>काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला

"या दुःखद घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा समूह १ कोटी रुपये आर्थिक मदत देईल. तसेच जखमी झालेल्यांच्या वैद्यकीय खर्च आम्ही करू आणि त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार व सहकार्य मिळेल याची काळजी घेऊ. याशिवाय, बी जे मेडिकलच्या होस्टेलच्या उभारणीसाठीही आम्ही मदत करू", असे चंद्रशेखरन यांनी सांगितले. 

"या कठीण काळात ज्या कुटुंबांवर हे दुःख कोसळले आहे, त्यांच्या आम्ही ठामपणे उभे आहोत", अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

२०४ मृतदेह काढले बाहेर, ४१ जणांवर उपचार सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विमानातील २४० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २०४ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, मृतदेह पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत आहे. काही मृतदेहांचे शिर आणि इतर अवयव तुटले गेले आहेत. या सगळ्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाणार आहे. पोलीस आयुक्ती दिलेल्या माहितीनुसार ४१ जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाTataटाटाAir Indiaएअर इंडियाAccidentअपघातairplaneविमानahmedabadअहमदाबाद