शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

सुनावणीनंतर याचिका मागे नाही

By admin | Updated: January 16, 2016 01:11 IST

कोणतीही जनहित याचिका एकदा दाखल होऊन सुनावणी झाली की ती मागे घेता येणार नाही, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिर प्रकरणी सोमवारी सुनावणी निश्चित

नवी दिल्ली : कोणतीही जनहित याचिका एकदा दाखल होऊन सुनावणी झाली की ती मागे घेता येणार नाही, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिर प्रकरणी सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे. केरळच्या ऐतिहासिक सबरीमाला मंदिरात मासिकपाळीच्या वयोगटातील मुली आणि महिलांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याकडे लक्ष वेधणाऱ्या वकिलाने धमक्या मिळत असल्याचे कारण देत जनहित याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली होती.जनहित याचिकेवर एकदा विचार झाल्यानंतर ती मागे घेता येत नाही, हे लोकांना कळू द्या, असे न्या. दीपक मिश्रा आणि एन. व्ही. रामण यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनच े(आयवायएलए) अध्यक्ष नौशाद अहमद खान यांनी अलीकडे धमक्या देणारे सुमारे ५०० फोन कॉल्स आल्याचे सांगत जनहित याचिका मागे घेऊ द्या अशी विनंती केली होती. तुम्हाला अशाप्रकारे याचिका मागे घेता येणार नाही. हा वाद घटनात्मकरीत्या सोडविला जाईल. या प्रकरणी न्यायालयाला मदत करण्यासाठी मित्र (अमॅकस क्युरी) नेमण्याचाही विचार केला जाईल, असे खंडपीठाने नमूद केले. रजोनिवृत्ती आलेल्या महिलांनाच या मंदिरात प्रवेश दिला जातो. सर्वच महिलांना प्रवेशाची परवानगी द्यावी, अशी विनंती वकिलांच्या या संघटनेने केली होती. आम्ही या मुद्यावर ८ फेब्रुवारी रोजी विचार करू, असे खंडपीठाने म्हटले होते. दीड हजार वर्षांची परंपरा?या मंदिराच्या परिसरात रजस्वला महिलांना प्रवेश नाकारण्याची परंपरा १५०० वर्षांपासून चालत आली आहे, असे सांगण्यात आल्यानंतर हे खरे आहे काय? असा प्रश्न न्यायाधीशांनी सरकारला विचारला होता. केवळ धर्माच्या आधारावर निर्बंध घातले जाऊ शकतात; मात्र सरसकट प्रवेश नाकारता येत नाही. सबरीमाला हे सार्वजनिक मंदिर आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रवेश दिला जावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. सबरीमाला मंदिर टेकडीवर असून तेथे धार्मिक यात्रेचा काळ ४१ दिवसांचा असल्यामुळे रजस्वला महिलांना पावित्र्य राखणे शक्य होत नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील के.के. वेणुगोपाल यांनी केरळ सरकारची बाजू मांडताना केला.