शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

सुनावणीनंतर याचिका मागे नाही

By admin | Updated: January 16, 2016 01:11 IST

कोणतीही जनहित याचिका एकदा दाखल होऊन सुनावणी झाली की ती मागे घेता येणार नाही, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिर प्रकरणी सोमवारी सुनावणी निश्चित

नवी दिल्ली : कोणतीही जनहित याचिका एकदा दाखल होऊन सुनावणी झाली की ती मागे घेता येणार नाही, असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिर प्रकरणी सोमवारी सुनावणी निश्चित केली आहे. केरळच्या ऐतिहासिक सबरीमाला मंदिरात मासिकपाळीच्या वयोगटातील मुली आणि महिलांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याकडे लक्ष वेधणाऱ्या वकिलाने धमक्या मिळत असल्याचे कारण देत जनहित याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली होती.जनहित याचिकेवर एकदा विचार झाल्यानंतर ती मागे घेता येत नाही, हे लोकांना कळू द्या, असे न्या. दीपक मिश्रा आणि एन. व्ही. रामण यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले. इंडियन यंग लॉयर्स असोसिएशनच े(आयवायएलए) अध्यक्ष नौशाद अहमद खान यांनी अलीकडे धमक्या देणारे सुमारे ५०० फोन कॉल्स आल्याचे सांगत जनहित याचिका मागे घेऊ द्या अशी विनंती केली होती. तुम्हाला अशाप्रकारे याचिका मागे घेता येणार नाही. हा वाद घटनात्मकरीत्या सोडविला जाईल. या प्रकरणी न्यायालयाला मदत करण्यासाठी मित्र (अमॅकस क्युरी) नेमण्याचाही विचार केला जाईल, असे खंडपीठाने नमूद केले. रजोनिवृत्ती आलेल्या महिलांनाच या मंदिरात प्रवेश दिला जातो. सर्वच महिलांना प्रवेशाची परवानगी द्यावी, अशी विनंती वकिलांच्या या संघटनेने केली होती. आम्ही या मुद्यावर ८ फेब्रुवारी रोजी विचार करू, असे खंडपीठाने म्हटले होते. दीड हजार वर्षांची परंपरा?या मंदिराच्या परिसरात रजस्वला महिलांना प्रवेश नाकारण्याची परंपरा १५०० वर्षांपासून चालत आली आहे, असे सांगण्यात आल्यानंतर हे खरे आहे काय? असा प्रश्न न्यायाधीशांनी सरकारला विचारला होता. केवळ धर्माच्या आधारावर निर्बंध घातले जाऊ शकतात; मात्र सरसकट प्रवेश नाकारता येत नाही. सबरीमाला हे सार्वजनिक मंदिर आहे. त्यामुळे प्रत्येकाला प्रवेश दिला जावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. सबरीमाला मंदिर टेकडीवर असून तेथे धार्मिक यात्रेचा काळ ४१ दिवसांचा असल्यामुळे रजस्वला महिलांना पावित्र्य राखणे शक्य होत नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील के.के. वेणुगोपाल यांनी केरळ सरकारची बाजू मांडताना केला.