शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

... तर लोक शेतीपासून दूर पळतील, उपराष्ट्रपती नायडूंचा अर्थमंत्र्यांना चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 8:44 AM

नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती

 नवी दिल्ली - उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांनी अर्थमंत्र्यांना चिमटा घेतला. वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नायडू यांच्या 'मूव्हींग ऑन मूव्हींग फॉरवर्ड अ इअर इन अ ऑफिस' या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात नायडू यांनी शेती क्षेत्राविषयी मत मांडताना अर्थमंत्री अरूण जेटलींना लक्ष्य केले. तसेच शेतीविषयक योग्य धोरण न राबविल्यास शेतकरी शेतीपासून दूर पळतील, असे भाकितही त्यांनी केले. 

नायडू यांच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, एच.डी.देवेगौडा, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटलींसह अनेक उच्चपदस्थ हजर होते. याप्रसंगी बोलताना उपराष्ट्रपती नायडू यांनी शेती क्षेत्रातील विकासाबद्दल नाराजी दर्शवली. कृषी क्षेत्राकडे अधिक प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे. अर्थमंत्रीदेखील येथे आहेत. कदाचित, त्यांना माझे हे वक्तव्य आवडणार नाही. कारण, त्यांना सर्वांचीच काळजी घ्यावी लागते. पण, आगामी  काळात कृषी क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात लक्ष घालावे लागणार आहे, अन्यथा लोक शेती करायचे सोडून देतील, अशा शब्दात नायडू यांनी भीती व्यक्त केली.

तसेच संसदेतील कार्यप्रणालीबाबतही मी थोडासा नाराज आहे. कारण, संसदेतही पाहिजे तितके, यशस्वीपणे काम होत नाही. इतर अनेक क्षेत्रात आपण विकास करत आहोत. विश्व बँक, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्याकडून जे रेटींग मिळत आहे, ते उत्तम आहे. देशाच्या आर्थिक विकासाबाबत जे काही होत आहे, ते अतिशय चांगल आहे. प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानाची बाब आहे. मात्र, शेतीविषयक धोरणांकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा शेतीपासून शेतकरी दूर पळतील अशी भीती नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर व्यक्त केली. दरम्यान, नायडूजी हे हाडाचे शेतकरी आहेत. त्यामुळेच मी ग्रामीण विकास मंत्री होऊ इच्छितो, असे नायडू्ंनी एकदा म्हटले होते, अशी आठवण पंतप्रधान मोदींनी करून दिली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVenkaiah Naiduव्यंकय्या नायडूArun Jaitleyअरूण जेटली