शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

विदर्भाला सर्वात जास्त चटके, तापमानवाढीमुळे भारताचा जीडीपी घसरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 13:21 IST

2050 पर्यंत भारताचा जीडीपी 2.8 टक्क्यांनी घसरेल आणि भारताच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे राहणीमान हवामान बदलामुळे घसरेल

नवी दिल्ली- हवामान बदल आणि तापमान वाढीचा धोका संपूर्ण पृथ्वीला असल्याचं आता जाणवत आहे. तापमानवृद्धीमुळे पयार्वरणाचा होत चाललेला नाश यामुळेही माणसाच्या समोर अऩेक संकटे उभी राहिली आहेत. जागतिक बँकेने तापमानवृद्धीचा भारताला मोठा फटका बसेल असे एका अभ्यासातून स्पष्ट केले आहे. 60 कोटी भारतीयांचे आयुष्य तापमानवाढीमुळे प्रभावित होणार आहे.2050 पर्यंत भारताचा जीडीपी 2.8 टक्क्यांनी घसरेल आणि भारताच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे राहणीमान हवामान बदलामुळे घसरेल. मध्य भारतातील जिल्हे विशेषतः विदर्भात तापमानात मोठी वृद्धी झाल्यामुळे तेथे अर्थकारण 10 टक्क्यांनी मंदावेल असे जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे. गेल्या काही वर्षांपासून विदर्भ आणि तेलंगण तसेच मध्य भारतातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमान अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने व्यक्त केलेली भीती काळजी करायला लावणारी आहे.

दक्षिण आशियातील हॉटस्पॉटस या अभ्यासामध्ये 2015 पर्यंत भारताचा जीडीपी 2.8 टक्क्यांनी घसरेल त्यामुळे भारताला 1.1 ट्रीलियन डॉलर्सचा फटका सहन करावा लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तापमान वाढीचा फटका किनारी प्रदेश आणि पर्वतमय प्रदेशापेक्षा मध्य भारताला आणि उत्तर भारताला जास्त बसेल असेही या अभ्यासामध्ये आढळले आहे. छत्तिसगड, मध्यप्रदेशातील लोकांच्या राहणीमानात 9 टक्क्यांनी घसरण होईल तसेच विदर्भातील शेतीला सर्वात जास्त फटका बसणार आहे. भारतातील 10 हॉटस्पॉटमध्ये 7 जिल्हे विदर्भातील आहेत.

टॅग्स :Vidarbhaविदर्भIndiaभारतWorld Bankवर्ल्ड बँकMaharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमानTelanganaतेलंगणा