शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

'लोकांनी घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 5:49 AM

पंतप्रधान मोदींचे आवाहन : विरोधकांवर अपप्रचार व चिथावणीचा आरोप

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष अपप्रचार करून लोकांना चिथावणी देत आहेत, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘माझा तिरस्कार करा, हवे तर माझे पुतळे जाळा, पण देशवासियांच्या संपत्तीचे नुकसान करू नका’, असे आवाहन रविवारी येथे केले.

दिल्ली महानगरातील १७०० हूनही अधिक बेकायदा वसाहती नियमित करण्याच्या निर्णयाबद्दल दिल्ली प्रदेश भाजपाने रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या ‘अभिनंदन सभे’त मोदी बोलत होते. या सभेने मोदींनी आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचेही बिगुल फुंकले. सुमारे सव्वा तासाच्या भाषणात मोदी यांनी बव्हंशी सुधारित नागरिकत्व कायदा व त्याविरोधात देशात सुरु असलेले आंदोलन यावर सविस्तर भाष्य केले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांपासून विरोधक काही तरी निमित्त शोधून देशात अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप करून मोदी म्हणाले की, खरे तर या नव्या नागरिकत्व कायद्याचा भारतातील मुस्लिमांशी तर सोडाच पण देशाच्या १३० कोटी नागरिकांपैकी कोणाचाही संबंध नाही. आम्ही २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून ‘एनआरसी’ची आम्ही कधी चर्चा केली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त आसाममध्ये ‘एनआरसी’ नोंदणी करावी लागली. तरीही मुस्लिमांना ‘डिटेन्शन सेंटर’मध्ये ठेवणार असल्याचा प्रचार शहरी नक्षलींनी व इतरांनी सुरु केला. परंतु आसाम सोडून उर्वरित भारतात ‘एनआरसी’ लागू करण्याचा विचार नसल्याची ग्वाही देऊन त्यांनी मुस्लिमांना आश्वस्त केले.

कोणी अपप्रचार केला तरी सुशिक्षित तरुणांनी त्यास बळी पडून डोकी भडकावून घेई नयेत, असे सांगून पंतप्रधानांनी उपस्थित श्रोेत्यांना आवाहन केले की, तुम्ही घेतलेल्या शिक्षणाचा आदर करा. हा कायदा तुम्ही स्वत: वाचा आणि समजावून घ्या. तुम्हीच निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी पूर्ण जबाबदारीने हा कायदा मंजूर केला आहे. त्यामुळे संसदीय शुचितेचा सन्मान राखा.स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत नागरिकांचे रक्षण करताना ३३ हजार पोलिसांनी प्राणांची आहुती दिली आहे, याचे स्मरण देऊन पंतप्रधांनीनी आंदोलकांकडून पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला. आंदोलनाच्या नावाने होणाºया हिंसेचा निषेध करण्याऐवजी मौन बाळगणाऱ्यांची या हिंसाचारास मूक संमती असल्याचे दिसते, असेही ते म्हणाले.

विविधतेत एकता हीच भारताची विशेषतासुरुवातीस मोदींनी ‘विविधतेत एकता, हिच भारताची विशेषता’ अशी नवी घोषणा दिली. घोषणेतील ‘विविधतेत एकता’ हा पूर्वार्ध पंतप्रधनांनी सांगितला व ‘हिच भारताची विशेषता’ हा उत्तरार्ध श्रोत्यांना पूर्ण करण्यास सांगितला. घोषणेचा त्रिवार जयघोष केल्यानंतर मोदींनी सुमारे सव्वा तास भाषण केले.

जाती, धर्माचा भेदभाव नाहीआमच्या सरकारने कोणताही निर्णय घेताना वा अंमलबजावणी करताना जाती, धर्माच्या आधारे भेदभाव केल्याचे एक तरी उदाहरण अपप्रचार करणाऱ्या विरोधकांनी दाखवावे, असे आव्हान देत मोदी म्हणाले, प्रत्येक योजना राबविताना गरीब व वंचितांचे कल्याण हा एकच निकष समोर ठेवला.लोकांनी घुसखोर आणि शरणार्थी यांच्यातील फरक लक्षात घ्यायला हवा. घुसखोर चोरून देशात येतात व आपली ओळख लपवत राहात असतात. या उलट शरणार्थी आपले भविष्य सुखकर व्हावे यासाठी उघडपणे देशात येतात व आपली ओळख स्वत:हून जपतात.- नरेंद्र मोदी, प्रधानमंत्रीमोदी-शहांच्या द्वेषाला प्रेमानेच पराभूत करू - राहुल गांधीनवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काँग्रेसवर सडकून केलेल्या टिकेला कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी ‘तुमच्या व्देषाच्या राजकारणाला आम्ही प्रेमानेच पराभूत करू’, असे प्रत्युत्तर रविवारी दिले. गेले काही दिवस परदेशात असलेल्या राहुल गांधी यांनी देशातील युवापिढीला उद्देशून टिष्ट्वट करत नरेंद्र मोदी यांच्या टिकेला उत्तर दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकMuslimमुस्लीमdelhiदिल्लीRahul Gandhiराहुल गांधी