शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

लोकांनी सरकारच्या भरवशावर मुलांना सोडून देऊ नये, योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 17:37 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे

लखनऊ, दि. 30 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. योगी आदित्यनाथ बोलले आहेत की, 'असं होऊ नये की मुलं दोन वर्षाची झाल्यानंतर पालकांनी त्यांना सरकारच्या भरवशावर सोडून द्यावं. सरकारने त्यांचा सांभाळ करावा असं त्यांना वाटू नये'. योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरचा उल्लेख केला नसला तरी अनेकांनी नेमकं यातून योगी आदित्यनाथांना काय म्हणायचं आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. 'इकडे कचरा पडला आहे, तिकडे कचरा पडला आहे असं प्रसारमाध्यमं नेहमी सांगत असतात. ही सरकारची जबाबदारी आहे हे आम्हाला मान्य आहे. असं वाटत सगळ्या जबाबदा-यांतून मुक्त झालो आहोत', असं योगी आदित्यनाथ बोलले आहेत. 

स्टार्टअप यात्रा कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ बोलले आहेत की, 'आम्ही शिक्षणाला फक्त अक्षर ज्ञानापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. असं केल्यास रोजगाराची समस्या उभी राहणार नाही. आम्ही SIDBI सोबत मिळून एक हजार कोटींचा स्टार्टअप फंडची सुरुवात करत आहोत. यामुळे तरुणांना मदत मिळेल'. यावेळी बोलताना त्यांनी मान्य केलं आहे, असे अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहचत नाही. 

गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृतांची संख्या १0५ वर गेली असली तरी उत्तर प्रदेश सरकार त्याकडे फारशा गंभीरपणे पाहताना दिसत नसल्याचे जाणवत आहे. ऑगस्टरच्या दुस-या आठवड्यात ३0 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर आकडा ७ आहे, असे मान्य केले. नंतर संख्या ६३ वरून वाढत गेली आणि आता ती १0५ झाली.

हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झालं होतं. विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला होता. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला होता. 

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गोरखपूरमध्ये जाऊन  चार मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ हेही गोरखपूरला आले आणि त्यांनी हातात झाडू घेऊ न, परिसर स्वच्छ करतानाची छायाचित्रे काढून घेतली होती. त्यानंतर गोरखपूरला पिकनिक स्पॉट बनवण्याची परवानगी युवराजांना दिली जाणार नाही, असे विधान राहुल गांधी यांना उद्देशून केले होते.

आपल्यासोबत कोणीही डॉक्टर अथवा अ‍ॅम्बुलन्स नकोय, असे राहुल यांनी दौºयाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. डॉक्टरांची गरज मेंदूज्वराच्या रुग्णांना आहे, असेही ते म्हणाले होते.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा