शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मोदीजी, निवडणुकांपेक्षा जनता जास्त महत्त्वाची असते- कमल हसन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 12:09 PM

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यामध्ये चालढकल करत असल्याचा आरोप आहे.

चेन्नई: कर्नाटकमधील निवडणुकांमुळे कावेरी पाणीवाटबाबत केंद्र सरकार तामिळनाडूतील जनतेवर अन्याय करत आहे. पंतप्रधान मोदींनी तात्काळ निर्णय घेऊन हा गैरसमज दूर केला पाहिजे. कारण, कोणत्याही निवडणुकांपेक्षा जनता जास्त महत्त्वाची असते, हे मोदींनी ध्यानात ठेवावे, असे मत अभिनेता व राजकारणी कमल हसन यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनासाठी चेन्नईत आले होते. मोदींच्या तामिळनाडू भेटीच्या आधी ट्विटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. कावेरी पाणी वाटप प्रश्नात अन्याय झाल्याची भावना तामिळनाडूतील लोकांमध्ये आहे. त्यामुळेच #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. याच पार्श्वभूमीवर कमल हसन यांनीदेखील एक व्हीडिओ ट्विट करून मोदींसमोर आपले म्हणणे मांडले. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पाँडिचेरी या राज्यांमध्ये कावेरी नदीतील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी नियामक मंडळ स्थापन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यामध्ये चालढकल करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे केंद्राने हा गैरसमज दूर करावा. तुम्ही मनात आणल्यास तामिळनाडूला लगेच न्याय मिळू शकतो. जनता ही निवडणुकांपेक्षा जास्त महत्त्वाची असते, हे लक्षात ठेवा, असे कमल हसन यांनी व्हीडिओत म्हटले आहे. 

 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनbollywoodबॉलिवूडNarendra Modiनरेंद्र मोदी